शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 2:33 AM

झामुमोच्या उमेदवारासाठी प्रचारसभा, भाजपच्या काळात बेरोजगारी वाढली

झारखंड : झारखंडमध्ये विरोधी पक्षांची आघाडी सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले.

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी येथे झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार कितुबुद्दीन शेख यांना पाठिंबा देणाºया प्रचार सभेत गांधी म्हणाले की, काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने बहुमत मिळवल्यास शेतकºयांना भाताच्या प्रत्येक क्विंटलमागे २,५०० रुपये किमान आधारभूत भाव मिळेल.

विरोधकांच्या आघाडीचे पहिले प्राधान्य हे दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास असेल. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या सरकारांनी २,५०० रुपये किमान आधारभूत भावाने तांदूळ विकत घेतला तोच कित्ता झारखंडमध्येही आम्ही निवडणूक जिंकलो तर गिरवला जाईल, असे गांधी म्हणाले.

काँग्रेसने नेहमीच दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असे ठासून सांगून राहुल गांधी यांनी देशात बेरोजगारीत वाढ केल्याबद्दल केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. आज बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे गरीब वर्गाला मोठा फटका बसल्याचे व आजही लोकांना त्यात भरडून निघावे लागत असल्याचे ते म्हणाले. तरीही भाजपचे सरकार केवळ १०-१५ उद्योगपतींच्या लाभांसाठी काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची ही प्रचारसभा केवळ १० मिनिटे चालली. 

६२ टक्के मतदान

रांची : झारखंड विधानसभेच्या तिसºया टप्प्यात १७ जागांच्या निवडणुकीसाठी ६२.३५ टक्के मतदान झाले. शहरी भागात झालेले हे मतदान शांततेत पार पडले. ५६ लाखांपेक्षा अधिक मतदारांनी ३०९ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय ईव्हीएम यंत्रात बंदिस्त केला. मुख्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी सांगितले की, सायंकाळी मतदान संपेपर्यंत ६२.३५ टक्के मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरी