शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 06:01 IST

RSS चे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये साधणार महाराष्ट्रात समन्वय

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चार राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने (आरएसएस) कंबर कसली आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपसोबत समन्वय समितीच्या बैठकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेतृत्व सक्रिय सहभागी होत आहे. 

आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये हे महाराष्ट्रात भाजपशी समन्वय साधतील, तर दुसरे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार हरयाणात समन्वयाने काम करत आहेत. ते झारखंड आणि जम्मू-काश्मीरचेही काम पाहत आहेत. अरुण कुमार हे भाजपसोबत राष्ट्रीय स्तरावर समन्वयाचे काम पाहत आहेत; पण विधानसभा निवडणुकीसाठी ते या राज्यांवरही विशेष लक्ष देणार आहेत. 

झारखंडची सत्ता मिळविण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. आरएसएसने जुलैत रांची येथे राष्ट्रीय बैठक आयोजित केली होती. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. नड्डा तेव्हा म्हणाले होते की, राजकारणात आरएसएसच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्याऐवजी भाजप स्वत:च्या बळावर राजकारण करण्यास सक्षम आहे. त्यावर आरएसएसने भाष्य केले नाही. आरएसएसने स्वतःच्या कार्यकर्त्यांना आणि इतर आघाडीच्या संघटनांना संदेश पाठवला आहे.

लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, हरयाणात भाजपला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, तसेच झारखंडमध्येही १४ पैकी ८ जागांवरच विजय मिळविता आला, तर आदिवासीबहुल असलेल्या राज्यातील लोकसभेच्या पाचही जागा भाजपने गमावल्या. महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपची सत्ता आहे. येथे पुन्हा जिंकण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024