मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार 

By महेश गलांडे | Published: February 26, 2021 07:29 PM2021-02-26T19:29:17+5:302021-02-26T19:29:29+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केलाय.

Following the Modi-Shah tour, election dates, Mamata bannerji's attack on the commission | मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार 

मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार 

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांना अनुसरुन तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपाने जे सांगितलं, तेच निवडणूक आयोगाने केलंय.

कोलकाता- देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूया राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या तारखांवर आक्षेप घेत, आयोगाला प्रश्न विचारले आहेत. Assam, Kerala, Tamil Nadu, Puducherry and West Bengal State Assembly election 2021 full schedule

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केलाय. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. भाजपाच्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. यंदा पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान होत आहे. पण, एकाच जिल्ह्यात तीन टप्प्यांत का मतदान घेण्यात येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसेच, बंगालमध्ये बंगालीच राज्य करणार, बाहेरच्यांना आम्ही घुसू देणार नाही, असेही त्यांनी म्हटलंय. 

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांना अनुसरुन तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपाने जे सांगितलं, तेच निवडणूक आयोगाने केलंय. गृहमंत्र्यानी आपल्या ताकदीचा दुरुपयोग केला आहे. पण, आता खेळ सुरू झालाय, आम्ही खेळू आणि जिंकूच. भाजपाला नक्कीच पराभूत करू, असा विश्वासही ममता बॅनर्जींनी व्यक्त केलाय. 

कोरोनाचा विचार करुन निवडणुका

कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.  

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक

पहिला टप्पा - 27 मार्च मतदान
दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान
तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान
चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान
पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान
सहावा टप्पा- 22 एप्रिल मतदान
सातवा टप्पा-  26एप्रिल मतदान
आठवा टप्पा- 29 एप्रिल मतदान

निकाल - 2 मे रोजी
 

Web Title: Following the Modi-Shah tour, election dates, Mamata bannerji's attack on the commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.