शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

यमुनानगर, अंबालामध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:50 AM

दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, यमुनानगर व अंबाला जिल्ह्यांत, तसेच कुरुक्षेत्र व पानिपतच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यमुनानगर : हरियाणाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, यमुनानगर व अंबाला जिल्ह्यांत, तसेच कुरुक्षेत्र व पानिपतच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घराचे छत कोसळून दोन अल्पवयीन भावांचा मृत्यू झाला.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांमध्ये अंबालामध्ये १२७ मि.मी., कुरुक्षेत्रमध्ये १२० मि.मी. व यमुनानगरमध्ये १०२ मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे यमुनानगर, जगध्री, राडौर व सरस्वतीनगरसारख्या काही भागांमध्ये अनेक वसाहती व कार्यालये पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांना आपली घरे सुरक्षित ठेवण्यासाठी झगडावे लागत आहे. हजारो एकरवरील पिके व भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनाही पिकांचे नुकसान होण्याची भीती वाटत आहे. यमुनानगर जिल्ह्यातील एका शेतकºयाने सांगितले की, पिके पाण्याखाली गेली आहेत व जागोजागी पाणी साचल्यामुळे पाळीव प्राण्यांना चारा देणे अवघड झाले आहे.तुफान पावसामुळे घराचे छत कोसळून दोन अल्पवयीन भाऊ मृत्युमुखी पडले. यमुनानगर जिल्ह्यातील सारन गावात ही दुर्घटना घडली. हे दोघेही घरात झोपलेले असताना हा प्रकार घडला.हरियाणा कृषी विभागाचे उपसंचालक सुरेंद्र यादव यांनी सांगितले की, सध्या तरी पिके नष्ट झाल्याचे अहवाल प्राप्त नाहीत. मात्र, सध्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे आगामी काही काळात पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पुढील चार दिवसांत यमुनानगर, अंबाला, कैथल, कुरुक्षेत्र व पंचकुला जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :floodपूर