शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 27 जिल्ह्यांतील तब्बल 7 लाखांहून अधिक लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 1:00 PM

Assam Flood : राज्यातील 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गुरुवारी पूरस्थिती आणखी गंभीर झाली आणि यामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला. राज्यातील 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कामपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय कामपूरमध्ये आणखी दोन जण बेपत्ता आहेत, असं त्यात म्हटलं आहे. यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दहा झाली आहे, असं अहवालात म्हटलं आहे.

पुरामुळे राज्यात 7,17, 500 हून अधिक लोक बाधित झाल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कछार, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, दिमा हसाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, कामरूप मेट्रोपॉलिटन, कार्बी आंगलाँग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबाडी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.

नगावमध्ये सर्वाधिक 3.31 लाख लोक बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ कछार (1.6 लाख) आणि होजाली (97,300) यांचा क्रमांक लागतो. बुधवारपर्यंत राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 6.62 लाख लोक बाधित झाले होते. प्राधिकरणाने सांगितलं की, सध्या 1790 गावं पाण्यात बुडाली असून संपूर्ण राज्यात 63,970.62 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. त्यात असे म्हटले आहे की, अधिकारी 14 जिल्ह्यांमध्ये 359 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 80,298 लोकांना आश्रय दिला आहे. यामध्ये 12,855 मुलांचा समावेश आहे.

एका बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की लष्कर, निमलष्करी दल, NDRF, SDRF, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि स्थानिक लोकांनी 7,334 लोकांना विविध पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर केला. अधिकाऱ्यांनी 7,077.56 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 6,020.90 लीटर मोहरीचे तेल, 2,218.28 क्विंटल चारा आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस