शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच बाहेरील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 11:41 IST

कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये जन्मलेले आयएएस अधिकारी नवीन चौधरी यांना जम्मू-काश्मीरचे पहिले डोमिसाईल प्रमाणपत्र मिळाले नवीन चौधरी सध्या जम्मूमध्ये वास्तव्यास असून, जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेतदुसऱ्या राज्यातून येऊन जम्मू काश्मीरचे स्थायी नागरिक बनलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत

जम्मू - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतला होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाबाबतचे अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.

बिहारमध्ये जन्मलेले आयएएस अधिकारी नवीन चौधरी यांना जम्मू-काश्मीरचे पहिले डोमिसाईल प्रमाणपत्र मिळाले आहे. नवीन चौधरी सध्या जम्मूमध्ये वास्तव्यास असून, जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेत. दुसऱ्या राज्यातून येऊन जम्मू काश्मीरचे स्थायी नागरिक बनलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत.  

नवीन चौधरी हे मुळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी जम्मूमधील बाहू तहसिलदार कार्यालयात डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची छाननी करून बाहूचे तहसीलदार रोहित शर्मा यांनी नवीन चौधरी यांना डोमिसाईल सर्टिफिकेट प्रदान केले आहे.

नवीन चौधरी यांनी हे डोमिसाईल सर्टिफिकेट जम्मू-काश्मीर ग्रँट डोमिसाईल सर्टिफिकेट प्रोसिजर रूल्स २०२० च्या नियम ५ अंतर्गत प्रदान करण्यात आले आहे. हा कायदा हल्लीच जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याला अनेक संघटनांनी विरोध केला होता. मात्र या अधिवास कायद्याला केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली होती.  

केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये नव्या डोमिसाईल कायद्याला (दुरुस्ती) मंजुरी दिली होती. या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचे १५ वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्य आहे किंवा ज्या व्यक्तींनी राज्यात सात वर्षे शिक्षण घेतले आहे आणि याच राज्याच्या शाळेमधून दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे, अशा व्यक्तींना राज्याचे नागरिकत्व मिळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indiaभारत