शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच बाहेरील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 11:41 IST

कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये जन्मलेले आयएएस अधिकारी नवीन चौधरी यांना जम्मू-काश्मीरचे पहिले डोमिसाईल प्रमाणपत्र मिळाले नवीन चौधरी सध्या जम्मूमध्ये वास्तव्यास असून, जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेतदुसऱ्या राज्यातून येऊन जम्मू काश्मीरचे स्थायी नागरिक बनलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत

जम्मू - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतला होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाबाबतचे अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.

बिहारमध्ये जन्मलेले आयएएस अधिकारी नवीन चौधरी यांना जम्मू-काश्मीरचे पहिले डोमिसाईल प्रमाणपत्र मिळाले आहे. नवीन चौधरी सध्या जम्मूमध्ये वास्तव्यास असून, जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेत. दुसऱ्या राज्यातून येऊन जम्मू काश्मीरचे स्थायी नागरिक बनलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत.  

नवीन चौधरी हे मुळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी जम्मूमधील बाहू तहसिलदार कार्यालयात डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची छाननी करून बाहूचे तहसीलदार रोहित शर्मा यांनी नवीन चौधरी यांना डोमिसाईल सर्टिफिकेट प्रदान केले आहे.

नवीन चौधरी यांनी हे डोमिसाईल सर्टिफिकेट जम्मू-काश्मीर ग्रँट डोमिसाईल सर्टिफिकेट प्रोसिजर रूल्स २०२० च्या नियम ५ अंतर्गत प्रदान करण्यात आले आहे. हा कायदा हल्लीच जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याला अनेक संघटनांनी विरोध केला होता. मात्र या अधिवास कायद्याला केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली होती.  

केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये नव्या डोमिसाईल कायद्याला (दुरुस्ती) मंजुरी दिली होती. या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचे १५ वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्य आहे किंवा ज्या व्यक्तींनी राज्यात सात वर्षे शिक्षण घेतले आहे आणि याच राज्याच्या शाळेमधून दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे, अशा व्यक्तींना राज्याचे नागरिकत्व मिळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indiaभारत