शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच बाहेरील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 11:41 IST

कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये जन्मलेले आयएएस अधिकारी नवीन चौधरी यांना जम्मू-काश्मीरचे पहिले डोमिसाईल प्रमाणपत्र मिळाले नवीन चौधरी सध्या जम्मूमध्ये वास्तव्यास असून, जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेतदुसऱ्या राज्यातून येऊन जम्मू काश्मीरचे स्थायी नागरिक बनलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत

जम्मू - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतला होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाबाबतचे अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारतातील बाहेरील राज्यातून येऊन जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळवण्याचा मान एका आयएएस अधिकाऱ्याला मिळाला आहे.

बिहारमध्ये जन्मलेले आयएएस अधिकारी नवीन चौधरी यांना जम्मू-काश्मीरचे पहिले डोमिसाईल प्रमाणपत्र मिळाले आहे. नवीन चौधरी सध्या जम्मूमध्ये वास्तव्यास असून, जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ते कमिश्नर सेक्रेटरी पदावर ते कार्यरत आहेत. दुसऱ्या राज्यातून येऊन जम्मू काश्मीरचे स्थायी नागरिक बनलेले ते पहिले अधिकारी ठरले आहेत.  

नवीन चौधरी हे मुळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी जम्मूमधील बाहू तहसिलदार कार्यालयात डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची छाननी करून बाहूचे तहसीलदार रोहित शर्मा यांनी नवीन चौधरी यांना डोमिसाईल सर्टिफिकेट प्रदान केले आहे.

नवीन चौधरी यांनी हे डोमिसाईल सर्टिफिकेट जम्मू-काश्मीर ग्रँट डोमिसाईल सर्टिफिकेट प्रोसिजर रूल्स २०२० च्या नियम ५ अंतर्गत प्रदान करण्यात आले आहे. हा कायदा हल्लीच जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याला अनेक संघटनांनी विरोध केला होता. मात्र या अधिवास कायद्याला केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली होती.  

केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये नव्या डोमिसाईल कायद्याला (दुरुस्ती) मंजुरी दिली होती. या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचे १५ वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्य आहे किंवा ज्या व्यक्तींनी राज्यात सात वर्षे शिक्षण घेतले आहे आणि याच राज्याच्या शाळेमधून दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे, अशा व्यक्तींना राज्याचे नागरिकत्व मिळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indiaभारत