शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे म्हणाले आता मी शांतपणे मरू शकेन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 9:37 PM

तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे. तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम राजकीय आवाज उठवणाऱ्या आरिफ मोहम्मद खान यांनीही तिहेरी तलाकचे स्वागत केले आहे.

बहराइच, दि. 22 - तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे. तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम राजकीय आवाज उठवणाऱ्या आरिफ मोहम्मद खान यांनीही तिहेरी तलाकचे स्वागत केले आहे. आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या खान यांना जेव्हा या निर्णयाची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी हा मानवता, संविधान आणि इस्लामचा विजय असल्याचे सांगितले. तसेच दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला न्यायालयात यश मिळाल्याने आता मी शांतपणे मरू शकेन अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे त्याचे सर्वाधिक श्रेय त्या महिलांना जाते ज्यांनी या प्रथेविरोधात न्यायालयात धाव घेतली. तसेच इस्लामच्या नावाने दुकान चालवणाऱ्यांची बाजू न घेता मानवतेची बाजू घेणाऱ्या सध्याच्या सरकारचेही अभिनंदन केले पाहिजे, असे आरिफ मोहम्मद खान म्हणाले. माजी खासदार आणि माजी मंत्री असलेल्या आरिफ मोहम्मद खान यांनी मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकविरोधात प्रथम राजकीय बंडखोरी केली होती. 1986 साली शाहबाने खटल्यावेळी राजीव गांधी सरकारने कट्टरपंथी मुस्लिमांच्या दबावासमोर झुकून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. आरिफ मोहम्मद खान यांनी या निर्णयाचा विरोध केला होता.  "एक ना एक दिवस महिलांना त्यांचे अधिकार मिळतील असे मी त्यावेळी म्हटले होते. आज तो दिवस आला आहे. आता मी शांतपणे मरू शकतो." आरिफ मोहम्मद खान यांनी शाहबाने खटल्यावेळी राजीव सरकारने केलेल्या घटना दुरुस्तीला विरोध केला होता. तसेच त्याच निषेध म्हणून राजीनामाही दिला होता.  अधिक वाचा पाकिस्तानसह या देशांमध्ये आधीपासूनच 'बॅन' आहे ट्रिपल तलाक, बंदी आणणारा इजिप्त होता जगातला पहिला देशतिहेरी तलाक प्रकरण: शायराबानोच्या खटल्यामुळे शाहबानो खटल्याची आठवण  तिहेरी तलाक : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड भोपाळमधील बैठकीत ठरवणार पुढील रणनीती  दरम्यान, गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल सुनावला. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. तसेच, केंद्र सरकारनं सहा महिन्यांमध्ये तिहेरी तलाकला बंदी घालणारा कायदा बनवावा, असे निर्देश सरन्यायाधीश खेहर यांनी दिले. दरम्यान, कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर 6 महिने बंदी घालण्यात आली आहे.  पाच न्यायाधीशांचे घटनापीठ देणार असलेल्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशभरातील मुस्लिम महिलांचं या निकालाकडे लक्ष लागले होते. निकाल संपूर्णपणे नि:ष्पक्ष असावा आणि कुणालाही तक्रार करण्यास वाव राहू नये या उद्देशाने निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच प्रमुख  धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश करण्यात आला. सरन्यायाधीश जे.एस. खेहर (शीख), कुरियन जोसेफ (ख्रिश्चन), आर.एफ. नरिमन (पारशी), यू.यू. लळित (हिंदू) आणि अब्दुल नजीर (मुस्लिम) यांचा समावेश आहे.  

टॅग्स :IndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय