शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

'...तर आपली परिस्थिती गाझा-पॅलेस्टाईनसारखी होईल', फारुख अब्दुलांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 2:33 PM

Jammu & Kashmir: 'जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपलेला नाही, हा आधीपेक्षा जास्त वाढलाय.'

Farooq Abdullah on Terrorism ( Marathi News ): जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) दहशतवाद आणि लष्कराच्या कारवाईबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी मंगळवारी(दि.26) मोठे वक्तव्य केले. संवादातूनच समस्या सोडवता येऊ शकते, अन्यथा आपली गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी स्थिती होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद संपलेला नाही. हा आधीपेक्षा जास्त वाढलाय. आज द्वेष इतका वाढलाय की, आपण एकमेकांचे शत्रू आहोत, असे मुस्लिम आणि हिंदूंना वाटते. नवाझ शरीफ (Nawaz Sharif) पाकिस्तानात पंतप्रधान बनणार आहेत. जर ते चर्चेला तयार असतील, तर आपण का करू नये? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

शेजाऱ्यांशी मैत्रीत दोघांची प्रगती माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या विधानाचा संदर्भ देत फारुख अब्दुल्ला म्हणाले, मित्र बदलता येतात, शेजारी बदलता येत नाहीत. जर आपण आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंधात राहिलो तर दोघांचीही प्रगती होईल. पण, जर आपण त्यांच्याशी शत्रुत्व राखले, तर आपण लवकर प्रगती करू शकणार नाही. आजच्या युगात युद्ध हा पर्याय नाही, असे खुद्द मोदीजींनी (Narendra Modi) म्हटले आहे. चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असंही अब्दुल्ला म्हणाले. 

21 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ला दरम्यान, गुरुवारी (21 डिसेंबर) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर हल्ला केला होता. लष्कराच्या दोन वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद झाले, तर 3 जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर देत काही दहशतवाद्यांना ठार केले. महिनाभरात या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादBJPभाजपा