शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काही अदृश्य शक्तींना शेतकरी आंदोलनात तोडगा निघू नये असं वाटतंय; कृषी मंत्र्यांचा निशाणा कोणावर?

By कुणाल गवाणकर | Updated: January 24, 2021 16:23 IST

सरकारनं शेतकऱ्यांना अनेक प्रस्ताव दिले; पण शेतकऱ्यांनी एकही प्रस्ताव दिला नाही- नरेंद्र तोमर

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टर मोर्चाची तयारी सुरू केली आहे. २६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. यानंतर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं आहे. हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

शेतकरी संघटना केवळ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतात. ते कायद्यांच्या फायद्यांबद्दल बोलतच नाहीत, असं म्हणत तोमर यांनी दु:ख व्यक्त केलं. शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असा दावा त्यांनी केला. या अदृश्य शक्ती कोण आहेत, याबद्दल विचारलं असता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे फायदे जाणूनच घेण्याची इच्छाच नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरल्या, असं तोमर यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही संवेदनशीलपणे हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं तोमर यांनी सांगितलं. 'शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर आंदोलन सुरू केल्यापासूनच आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. या विषयात तोडगा निघावे यासाठी आमच्याकडून अनेकदा प्रयत्न केले गेले,' असं तोमर म्हणाले.

आम्ही आंदोलक शेतकऱ्यांना बैठकांच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिले. शुक्रवारी आमची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. त्याआधीच आम्ही त्यांना सरकार दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. याबद्दलचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला. मात्र तो त्यांनी अमान्य केला. तुम्ही सरकारला प्रस्ताव द्या, असं आवाहन सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं. मात्र शेतकऱ्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही, याकडे तोमर यांनी लक्ष वेधलं.
 

टॅग्स :Farmerशेतकरी