शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Exam News: मार्कशिटमध्ये १ गुण वाढवण्यासाठी लढला तीन वर्षे न्यायालयीन लढाई, बोर्ड अडला पण कोर्टाने वाढवून दिले २८ गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:27 IST

Exam News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामधील बारावीचा विद्यार्थी शांतनू शुक्ला याने १२वीच्या गुणपत्रिकेत एक गुण वाढवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली.

भोपाळ - परीक्षेच्या निकालामध्ये अनेकदा एखाद्या विषयात कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांची हताशा होत असते. मात्र यातील अगदीच मोजके जण त्याविरोधात फेरतपासणीसाठी जातात. मात्र मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामधील बारावीचा विद्यार्थी शांतनू शुक्ला याने १२वीच्या गुणपत्रिकेत एक गुण वाढवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली. अखेर तीन वर्षांनंतर त्याच्या लढ्याला यश आलं आणि जेव्हा त्याच्या उत्तर पत्रिकेची पुनर्तपासाणी झाली तेव्हा त्याला एका गुणाऐवजी तब्बल २८ गुण वाढवून मिळाले.

मात्र हे २८ गुण वाढवून घेण्यासाठी या विद्यार्थ्याला तब्बल ४० वेळा तारखेला हजर राहावे लागले. तसेच खटला लढण्यासाठी तीन वर्षांत सुमारे १५ हजार रुपये खर्च करावे लागले. १२वीच्या परीक्षेत त्याला ७४.८ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली आणि एका गुणाऐवजी तब्बल २८ गुण वाढवून मिळाले.

सागर जिल्ह्यातील परकोटा येथील विद्यार्थी शांतनू शुक्ल याने १२वीमध्ये चांगला अभ्यास केला होता. २०१८ मध्ये मध्य प्रदेश बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ७४.८ टक्के गुणांनी तो उत्तीर्ण झाला होता. मात्र आपल्याला बारावीत ७५ ते ८० टक्के गुण मिळतील, असा विश्वास शांतनूला होता. मात्र एक गुण कमी पडल्याने त्याला ७५ टक्के गुण मिळवता आले नाहीत. तसेच त्याला मुख्यमंत्री मेधावी योजनेचाही लाभ घेता आला नाही. मात्र आता न्यायालयीन लढाईनंतर शांतनूचे २८ गुण वाढल्याने त्याची टक्केवारी ८१ टक्क्यांपर्यंत जाणार आहे. तसेच त्याला मेधावी योजनेचा अर्जही भरता येणार आहे.

शांतनूने सांगितले की, कोरोनामुळे दोन वर्षे या खटल्याची सुनावणी होऊ शकली नव्हती. सुनावणी सुरू झाली तेव्हा कोर्टाने बोर्डाला ६ नोटीस पाठवल्या. मात्र त्यांच्याकडून काही भूमिका मांडण्यात आली नाही. फेरतपाणसीसाठी अर्ज केल तेव्हा त्यात एकही गुण वाढला नाही. त्यानंतर विविध विषयांच्या पेपरची कॉपी काढली. त्यात प्रश्नांची उत्तरे योग्य असल्याची टीक होती.मात्र त्याचे गुण दिले गेले नव्हते. त्यानंतर २०१८ मध्ये मी याचिका दाखल केली होती. कोर्टाने सुनावणी करताना माध्यमिक शिक्षण मंडळाला पुन्हा मूल्यांकन करण्याचे आदेश दिले. २१ फेब्रुवारी रोजी नवीन मार्कशिट मिळालं ज्यामध्ये ८०.४ टक्के गुण मिळाल्याचा उल्लेख आहे.  

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीCourtन्यायालयEducationशिक्षण