शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Exam News: मार्कशिटमध्ये १ गुण वाढवण्यासाठी लढला तीन वर्षे न्यायालयीन लढाई, बोर्ड अडला पण कोर्टाने वाढवून दिले २८ गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:27 IST

Exam News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामधील बारावीचा विद्यार्थी शांतनू शुक्ला याने १२वीच्या गुणपत्रिकेत एक गुण वाढवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली.

भोपाळ - परीक्षेच्या निकालामध्ये अनेकदा एखाद्या विषयात कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांची हताशा होत असते. मात्र यातील अगदीच मोजके जण त्याविरोधात फेरतपासणीसाठी जातात. मात्र मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामधील बारावीचा विद्यार्थी शांतनू शुक्ला याने १२वीच्या गुणपत्रिकेत एक गुण वाढवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली. अखेर तीन वर्षांनंतर त्याच्या लढ्याला यश आलं आणि जेव्हा त्याच्या उत्तर पत्रिकेची पुनर्तपासाणी झाली तेव्हा त्याला एका गुणाऐवजी तब्बल २८ गुण वाढवून मिळाले.

मात्र हे २८ गुण वाढवून घेण्यासाठी या विद्यार्थ्याला तब्बल ४० वेळा तारखेला हजर राहावे लागले. तसेच खटला लढण्यासाठी तीन वर्षांत सुमारे १५ हजार रुपये खर्च करावे लागले. १२वीच्या परीक्षेत त्याला ७४.८ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली आणि एका गुणाऐवजी तब्बल २८ गुण वाढवून मिळाले.

सागर जिल्ह्यातील परकोटा येथील विद्यार्थी शांतनू शुक्ल याने १२वीमध्ये चांगला अभ्यास केला होता. २०१८ मध्ये मध्य प्रदेश बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ७४.८ टक्के गुणांनी तो उत्तीर्ण झाला होता. मात्र आपल्याला बारावीत ७५ ते ८० टक्के गुण मिळतील, असा विश्वास शांतनूला होता. मात्र एक गुण कमी पडल्याने त्याला ७५ टक्के गुण मिळवता आले नाहीत. तसेच त्याला मुख्यमंत्री मेधावी योजनेचाही लाभ घेता आला नाही. मात्र आता न्यायालयीन लढाईनंतर शांतनूचे २८ गुण वाढल्याने त्याची टक्केवारी ८१ टक्क्यांपर्यंत जाणार आहे. तसेच त्याला मेधावी योजनेचा अर्जही भरता येणार आहे.

शांतनूने सांगितले की, कोरोनामुळे दोन वर्षे या खटल्याची सुनावणी होऊ शकली नव्हती. सुनावणी सुरू झाली तेव्हा कोर्टाने बोर्डाला ६ नोटीस पाठवल्या. मात्र त्यांच्याकडून काही भूमिका मांडण्यात आली नाही. फेरतपाणसीसाठी अर्ज केल तेव्हा त्यात एकही गुण वाढला नाही. त्यानंतर विविध विषयांच्या पेपरची कॉपी काढली. त्यात प्रश्नांची उत्तरे योग्य असल्याची टीक होती.मात्र त्याचे गुण दिले गेले नव्हते. त्यानंतर २०१८ मध्ये मी याचिका दाखल केली होती. कोर्टाने सुनावणी करताना माध्यमिक शिक्षण मंडळाला पुन्हा मूल्यांकन करण्याचे आदेश दिले. २१ फेब्रुवारी रोजी नवीन मार्कशिट मिळालं ज्यामध्ये ८०.४ टक्के गुण मिळाल्याचा उल्लेख आहे.  

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीCourtन्यायालयEducationशिक्षण