शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 19:45 IST

काँग्रेसने हरयाणा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवर आज आयोगाने उत्तर दिले आहे.

मागील महिन्यात हरयाणा निवडणुकीचे निकाल समोर आले. या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने मंगळवारी उत्तर दिले. एक निवेदन जारी करून काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना मतदान आणि मतमोजणीच्या दिवसांसारख्या संवेदनशील वेळी निराधार आणि खळबळजनक तक्रारीबाबत आवाहन केले.

बेजबाबदार आरोपांमुळे जनतेमध्ये अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला निवडणुकीनंतर बिनबुडाचे आरोप करणे टाळण्याचे आवाहन केले. आयोगाने काँग्रेसला  ठोस पावले उचलण्याचे आणि अशा तक्रारींच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचे आवाहन केले.

PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...

आयोगाने म्हटले आहे की, हरयाणातील निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा निर्दोष होता आणि तो काँग्रेस उमेदवार किंवा एजंटांच्या देखरेखीखाली पार पडला. २६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल फेरपडताळणी केली. सर्व तक्रारींवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून काँग्रेसला १६०० पानांचे उत्तर दिले आहे.

हरयाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तक्रारी फेटाळून लावल्या. हरयाणा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममध्ये ९९ टक्के बॅटरीची स्थिती दिसून आल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केल्यानंतर, मशिन्समध्ये संभाव्य छेडछाड झाल्याची तक्रार आणि अधिकाऱ्यांवर मतमोजणीला जाणूनबुजून उशीर केल्याचा होता.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४८ जागांवर बहुमत मिळवले आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपविरोधात सत्ताविरोधी लाटेचा फायदा उठवण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय INLD ने २ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.  त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग