शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बेदींच्या पराभवामागे अहंकार

By admin | Updated: February 11, 2015 02:15 IST

नवी दिल्लीत भाजपची परिस्थिती इतकी बिघडली आहे की , मुख्यमंत्रीपदाचीउमेदवार म्हणून ज्या किरण बेदी यांना त्यानी अत्यंत सुरक्षित समजल्या

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीनवी दिल्लीत भाजपची परिस्थिती इतकी बिघडली आहे की , मुख्यमंत्रीपदाचीउमेदवार म्हणून ज्या किरण बेदी यांना त्यानी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात उभे केले, तिथेही त्याना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीतील कृष्णानगर हा मतदारसंघ भाजपाच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित समजण्यात येतो, कारण भाजपाची ही परंपरागत जागा आहे. तरीही किरण बेदी यांचा येथे पराभव झाला. देशातील पहिली महिला आयपीएस अधिकारी म्हणून ज्यांचे कौतुक होते, त्या बेदी यांचा असा पराभव का झाला? भाजप कायकर्त्यांच्या मते बेदी यांचा दुराभिमान हेच पराभवाचे कारण आहे. निवडणुकीत बेदी यांचा पराभव हा राजकारणातील पराभव मानला जात आहे. या पहिल्या परीक्षत बेदी या नापास झाल्या आहेत. या पराभवानंतर भाजप नेतेही आता बेदी यांच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित करत आहेत. १५ जानेवारी रोजी किरण बेदी भाजपच्या दिल्लीतील मुख्यमनत्रीपदाच्या उमेदवार बनल्या, तेव्हापासूनच पक्षात त्यांच्याविरोधी वातावरण होते. बेदी या बाहेरच्या उमेदवार आहेत अशी कार्यकर्त्यांची तक्रार होती. ईशान्य दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनी बेदी यांना उघड विरोध केला होता. पण तेही नंतर गप्प बसले. कृष्णानगर हा मतदारसंघ भाजप नेता हर्षवर्धन यांचा होता. त्यांच्याशीही बेदी यांचे जमले नाही. पहिल्याच दिवशी बेदीनी हर्षवर्धन यांच्याशी पंगा घेतला. बेदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीस हर्षवर्धन थोडे उशिरा आले. त्यांची वाट पाहाण्याची गरज बेदी यांना वाटली नाही. हर्षवर्धन यांनी चतुराईने गोड बोलून आपली बाजू सांभाळून घेतली. पण नात्यात दुरावा यायचा तो आलाच आणि नंतर तर तो वाढतच गेला. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या निवडणुकीत जिथे हर्षवर्धन यांनी ४३ हजार मतानी विजय मिळविला होता, तिथेच बेदी यांना २३०० मतानी हार पत्करावी लागली.