शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

निकालापूर्वी विरोधकांना दुहेरी झटका, ईव्हीएम संशयावरुन EC आणि SC दोघांनी फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:55 PM

सर्व ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडीओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. व्हीव्हीपॅट मतदानाची 100 टक्के मतमोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. इतकचं नाहीतर प्रत्येक वेळेला त्याच त्याच विषयांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. 

याचदरम्यान मंगळवारी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात बैठक होणार आहे. त्यानंतर ईव्हीएमबाबतीत निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. ईव्हीएमवर घेतलेल्या संशयावरुन निवडणूक आयोगाने यूपीतील 4 याचिका फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएम सुरक्षित असून त्यावर विश्वास ठेवावा असं निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात याचिका करत मतदानाच्या पडताळणीसाठी ईव्हीएमसोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांचीही मतमोजणी करावी अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार सर्व ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडीओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. उत्तर प्रदेशात निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या सुरक्षेला घेऊन केलेल्या याचिका फेटाळल्या. राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर विश्वास ठेवावा. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे. एक्झिट पोलनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय पराभवाच्या भितीपोटी घेतला जातोय अशी टीका भाजपाने विरोधकांवर केली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

'ईव्हीएमवर संशय नको म्हणून 3 राज्यात काँग्रेसचा विजय; हे तर भाजपाचं षडयंत्र'

मात्र काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील काँग्रेसच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागले तर ज्या राज्यात काँग्रेस जिंकली ते फक्त भाजपाचं षडयंत्र होतं असा आरोप त्यांनी केला. या तीन राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने देऊन ईव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय दूर करण्याचा भाजपाचा डाव होता हे सिद्ध होईल असं त्यांनी सांगितलं होतं. तर ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VVPATव्हीव्हीपीएटीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग