शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

ताजमहाल नष्ट करायचा असेल तर तसं सांगा, सर्वोच्च न्यायालयाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 17:15 IST

तुम्हाला ताजमहाल नष्ट करायचा आहे का ? असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे

नवी दिल्ली, दि. 18 - तुम्हाला ताजमहाल नष्ट करायचा आहे का ? असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. उत्तर प्रदेशातील मथुरापासून ते दिल्लीपर्यंत अतिरिक्त रेल्वे ट्रॅक उभारण्यासाठी 450 झाडांची कत्तल करण्याची परवानगी मागणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत हा प्रश्न विचारला आहे. साक्षात सौंदर्याचे प्रतीक असलेला आग्रा येथील शुभ्र संगमरवरी ताजमहाल म्हणजे जगातील एक आश्‍चर्यच मानले जाते. 

'ताजमहाल एक जगप्रसिद्ध वास्तू आहे, आणि तुम्हाला ती नष्ट करायची आहे का ? ताजमहालचे आत्ताचे फोटो पाहिलेत का ? इंटरनेटवर जा आणि पहा ?', असा प्रश्नांचा भडिमार करत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरलं. न्यायाधीस मदन लोकूर आणि दिपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. 'जर तुमची तशी इच्छा असेल, तर मग न्यायालयात तसा अर्ज करा आणि सरळ सरळ आम्हाला ताजमहाल नष्ट करायचा आहे असं सागून टाका', असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. 

दिल्ली ते मथुरादरम्यान 80 किमी लांब अतिरिक्त रेल्वे ट्रॅक उभा करण्यासाठी 450 झाडांची कत्तल करण्याची मंजुरी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. ट्रेनची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अतिरिक्च रेल्वे ट्रॅकची गरज असल्याचं याचिकेत सांगण्यात आलं आहे. न्यायालयाने पुढील महिन्यात याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

ताजमहाल मकबरा की शिवमंदिर, सरकारला विचारला प्रश्नजगातील सात आश्‍चर्यापैकी एक आश्‍चर्य असणारे ताजमहाल मकबरा आहे की प्राचीन शिवमंदिर? असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगानं (CIC)  सरकारला विचारला आहे. ताजमहाल संदर्भात माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या आधिकारांतर्गत एक याचिका आयोगाकडे करण्यात आली होती. याच मुद्द्यावर केंद्रीय माहिती आयोगानं सांस्कृतिक मंत्रालयाचं मत विचारलं होतं. त्याचप्रमाणे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणलाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

संगमरवरनं बनलेलं जगप्रसिद्ध ताजमहाल हे शहाजान यांनी बनवलेला मकबरा आहे की राजा मानसिंह या राजपूत राजानं बनवलेला आणि मुगल शासकाला भेट दिलेलं शिवालय आहे? असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त श्रीधर आचार्यालू यांनी विचारला होता. 

ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे सुंदर शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. ताज महालाचे बांधकाम इ.स. १६५३ मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. युनेस्कोने ताज महाल या वास्तूला इ.स. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताज महालाला भेट देतात.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय