शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 05:16 IST

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधुनिक युद्धशास्त्रामध्ये ड्रोनचे असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल. 

भुज : ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. आतापर्यंत जे झाले तो फक्त ट्रेलर होता. गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू. त्यामुळे पाकिस्तानने यापुढे कोणतीही आगळीक करू नये असाही इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी दिला. ते म्हणाले की, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) मिळणाऱ्या एक अब्ज डॉलरच्या मदतीचा वापर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या दहशतवादासाठी होऊ शकतो. हा मुद्दा लक्षात घेऊन आयएमफने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यासंदर्भात फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केलेल्या भूजच्या दौऱ्यात तेथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला तसेच भारतीय हवाई दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी भूज येथील लष्करी जवानांशी संवाद साधताना सांगितले की, भारत आयएमएफला निधी देतो. हा पैसा पाकिस्तानसारख्या देशांत दहशतवादी कृत्यांसाठी वापरला जाऊ नये यासाठी दक्ष राहायला हवे. सध्याच्या काळात पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणे हे दहशतवादाला मदत करण्यासारखेच आहे. पाकिस्तानला भविष्यात कोणतीही मदत देणे आयएमएफने टाळायला हवे. भारताने नष्ट केलेल्या दहशतवादी तळांची पुनर्बांधणी करण्याचे काम पाकने हाती घेतले आहे, असे ते म्हणाले.

‘भारताने पाकिस्तानला ठेवले प्रोबेशनवर’

राजनाथसिंह म्हणाले की, एखाद्या गुन्हेगाराचं वर्तन सुधारावे म्हणून न्यायाधीश त्याला ‘प्रोबेशन’वर ठेवतो. जर त्या काळात त्याने काही गुन्हा केला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. तसेच सध्या भारताने पाकला शस्त्रसंधीतून प्रोबेशनवर ठेवलं आहे.  त्या देशाचे वर्तन सुधारले तर ठीक आहे, पण जर पुन्हा काही आगळीक घडली तर त्याला अतिशय कठोर शिक्षा दिली जाईल. पाक लष्कर व दहशतवादी संघटना यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे तेथील अण्वस्त्रे भविष्यात दहशतवाद्यांच्या हाती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भारतासह काही देशांना वाटते.

दहशतवादी तळांसाठी पाकिस्तानचा पैसा

पाकिस्तानने भूजमधील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला. त्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने केवळ शत्रूवर मातच केली नाही तर त्यांची अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त केली. मुरिदके आणि बहावलपूर येथील लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-मोहम्मदचे भारताने उद्ध्वस्त केलेले तळ पुन्हा उभारण्यासाठी पाकिस्तान सरकारने निधीही जाहीर केला आहे. 

पीओके ताब्यात घेताना अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल : भट्ट

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधुनिक युद्धशास्त्रामध्ये ड्रोनचे असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. ड्रोन, स्पेस, सायबर स्पेस या गोष्टींमुळे भविष्यातील युद्धांना नवीन आयाम मिळेल, असे भारतीय लष्कराचे माजी लष्करी संचालन महासंचालक (डीजीएमओ) निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिलकुमार भट्ट यांनी म्हटले आहे. चीनबरोबर डोकलाम येथे झालेल्या संघर्षाच्या काळात ते डीजीएमओ होते.  कोणतीही समस्या सोडवताना युद्ध हा सर्वात शेवटचा पर्याय असावा. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल. 

उपग्रह सुरक्षित ठेवावे लागतील 

जर परिस्थिती आणखी चिघळली असती तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पावले उचलली जाण्याची शक्यता होती. अवकाश हे क्षेत्र आता गुप्तचर यंत्रणेकरिता तसेच टेहळणीसाठी तसेच क्षेपणास्त्रांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. भविष्यात प्रत्येक देशाला आपले उपग्रह सुरक्षित ठेवावे लागतील व प्रतिस्पर्ध्यांचे उपग्रह कोणते? यावर लक्ष ठेवावे लागेल, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंह