शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

"दिल्ली हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा खराब, गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 5:17 PM

Delhi violence: 'दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी व्हावी'

ठळक मुद्देदिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. 'दिल्ली हिंसाचारप्रकरणी 600 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.''आमचा एसआयटीवर विश्वास नाही. याची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे'

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि आम आदमी पार्टी (आप) व्होट बँकेचे राजकारण करत आहे, असा आरोप करत काँग्रेसने दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्याव्या, अशी मागणी केली आहे. 

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी आमची मागणी केली. याशिवाय, हिंसाचारातील प्रत्येक पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. तसेच, हिंसाचारादरम्यान ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काहीच केले नाही, त्यांच्यावर आणि भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे मुकुल वासनिक यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, काँग्रेसची मागणी मागणी आहे की, दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले गृहमंत्री (अमित शहा) यांनी राजीनामा द्यावा. दिल्लीत निर्माण झालेल्या परिस्थितीला रोखण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही, असे आम्हाला वाटते. दिल्ली निवडणुकीच्यावेळी त्यांनी एक भाषण केले होते, त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, 'हा करंट शाहीन बागेत पोहोचला पाहिजे.' तसेच, दिल्ली हिंसाचारप्रकरणी 600 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर कोणताही कारवाई झाली नाही, असेही मुकुल वासनिक यांनी सांगितले. 

मुकुल वासनिक म्हणाले, "आमची मागणी आहे की वेळ न घालवता या नेत्यांवर सुद्धा एफआयआर दाखल झाला पाहिजे, आमचा एसआयटीवर विश्वास नाही. याची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तसेच, ज्या पोलिसांनी योग्यरित्या काम केले नाही, अशा पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे." 

टॅग्स :Mukul Wasnikमुकूल वासनिकcongressकाँग्रेसdelhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहा