हृदयद्रावक! "मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो", घरी आला मृत्यू झाल्याचा ईमेल; ३ महिन्यांचं बाळ पोरकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:57 IST2026-02-24T16:56:54+5:302026-02-24T16:57:38+5:30

मुलाच्या घरी परतण्याची आई-वडील वाट पाहत होते, त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना एका 'ईमेल'ने दिली.

delhi ranchi flight crash last call of pilot swarajdeep before crash | हृदयद्रावक! "मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो", घरी आला मृत्यू झाल्याचा ईमेल; ३ महिन्यांचं बाळ पोरकं

हृदयद्रावक! "मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो", घरी आला मृत्यू झाल्याचा ईमेल; ३ महिन्यांचं बाळ पोरकं

विमान अपघाताच्या आणखी एका दुःखद बातमीने 'एव्हिएशन सेफ्टी'वर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या अपघातात जीव गमावलेल्या पायलट स्वराजदीप यांच्या घरी सध्या शोककळा पसरली आहे. ज्या मुलाच्या घरी परतण्याची आई-वडील वाट पाहत होते, त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना एका 'ईमेल'ने दिली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विमानाने उड्डाण करण्यापूर्वी काही काळ आधी स्वराजदीप यांनी आपल्या कुटुंबाला फोन केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, ते रांचीहून दिल्लीला जात आहेत आणि लँडिंग झाल्यानंतर पुन्हा फोनवर बोलतील. मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो असं म्हटलं होतं. जेव्हा दोन तासांनंतर कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा फोन बंद लागला. त्यानंतर काही वेळातच न्यूज चॅनेलवर विमान कोसळल्याच्या बातम्या दिसू लागल्या.

अखेर संबंधित कंपनीने एक ईमेल पाठवून स्वराजदीप यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली. पायलट स्वराजदीप यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ३ महिन्यांचं बाळ आहे. त्यांचं लग्न २० महिन्यांपूर्वीच झालं होतं. शेजारी आणि स्थानिक नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. स्वराजदीप यांना ओळखणारे सर्वजण त्यांची आठवण एक अत्यंत दयाळू आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून काढत आहेत.

शिक्षणासाठी, उपचारांसाठी, एअर ॲम्ब्युलन्ससाठीही कर्ज; विमान अपघाताने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त

अमरदीप सिंह आणि मुख्तियार सिंह यांनी सांगितलं की, "आपल्या तरुण मुलाला अशा प्रकारे गमावणं हे कोणत्याही कुटुंबासाठी असह्य आहे. तो आपल्या आई-वडिलांचा अभिमान होता." या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लोक पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचत आहेत, मात्र मुलाच्या जाण्याने आई-वडिलांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये तीव्र संतापही पाहायला मिळत आहे. त्यांनी सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे (DGCA) कठोर आवाहन केलं आहे की, विमान सुरक्षेबाबत कडक मानके निश्चित केली जावीत. वारंवार होणाऱ्या विमान अपघातांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणाचाही 'स्वराजदीप' हिरावला जाणार नाही. तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.

Web Title: delhi ranchi flight crash last call of pilot swarajdeep before crash