शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

भाजप दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:16 IST

Delhi Govt Formation : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

Delhi Govt Formation : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच राजधानी दिल्लीला 'मिनी भारत' अशी ओळख देण्यासाठी नवीन मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश करण्याच्या पर्यायावर भाजप विचार करत आहे. 

यासंदर्भात भाजप नेत्यांनी बुधवारी माहिती दिली. दिल्ली सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याच्या हालचालीमुळे पक्षाला वेगवेगळ्या जाती, समुदाय आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या आमदारांना सामावून घेण्यास मदत होईल, असे पक्षाच्या काही नेत्यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांनी पीटीआयला संवाद साधला. 

यावेळी, दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणे खूप शक्य आहे, कारण इतर अनेक राज्यांमध्ये असे करण्यात आले आहे. तिथे विविध पार्श्वभूमीतील नेत्यांना सामावून घेण्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये असे करण्यात आले आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.

पुढे भाजप नेत्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव राष्ट्रीय नेतृत्वाच्या विचाराधीन आहे, जो त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. याशिवाय मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नावांवरही अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, विधिमंडळ गट नेत्याची निवड करण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. 

याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. या विजयामुळे २७ वर्षानंतर भाजपचे दिल्लीत कमबॅक झाले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा