शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Arvind Kejriwal : "केजरीवालांचं अटकेनंतर 4.5 किलोने कमी झालं वजन, भाजपा त्यांचं आरोग्य धोक्यात आणतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 11:15 IST

Arvind Kejriwal : अटक झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन 4.5 किलोने कमी झालं असून डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे असं आपचं म्हणणं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अटक झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन 4.5 किलोने कमी झालं असून डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे असं आपचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना येथे आणलं तेव्हा त्यांचं वजन 55 किलो होतं आणि आताही त्यांचं वजन 55 किलो आहे, असं तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे. तिहार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, "तुरुंगात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांची शुगर लेव्हल नॉर्मल आहे."

"आज सकाळीही त्यांनी योगा केला, ध्यानधारणा केली. जेलमधील डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही." अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. 1 एप्रिल रोजी त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर ते तिहार जेलमध्ये आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर य़ाबाबत एक पोस्ट केली आहे. 

"अरविंद केजरीवाल यांना गंभीर डायबीटीस आहे. आरोग्याच्या समस्या असतानाही ते 24 तास देशसेवेत तत्पर राहिले. अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांचे वजन 4.5 किलोने कमी झाले आहे. हे खूप चिंताजनक आहे. आज त्यांना तुरुंगात टाकून भाजपा त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर संपूर्ण देश सोडा, देवही त्यांना माफ करणार नाही"  असं आतिशी यांनी म्हटलं आहे. 

अरविंद केजरीवाल यांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना औषधे देण्यात आली आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ब्लड शुगर लेव्हल मॉनिटरिंग करण्यासाठी शुगर सेन्सर देखील देण्यात आला आहे. ते दुपारी आणि रात्रीच्या जेवणात घरी बनवलेले अन्न खात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.  पत्नी सुनीता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील ते बोलले आणि त्यांच्या वकिलाला देखील भेटले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारण