शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

Arvind Kejriwal : "केजरीवालांचं अटकेनंतर 4.5 किलोने कमी झालं वजन, भाजपा त्यांचं आरोग्य धोक्यात आणतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 11:15 IST

Arvind Kejriwal : अटक झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन 4.5 किलोने कमी झालं असून डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे असं आपचं म्हणणं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अटक झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन 4.5 किलोने कमी झालं असून डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे असं आपचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना येथे आणलं तेव्हा त्यांचं वजन 55 किलो होतं आणि आताही त्यांचं वजन 55 किलो आहे, असं तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे. तिहार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, "तुरुंगात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांची शुगर लेव्हल नॉर्मल आहे."

"आज सकाळीही त्यांनी योगा केला, ध्यानधारणा केली. जेलमधील डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही." अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. 1 एप्रिल रोजी त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर ते तिहार जेलमध्ये आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर य़ाबाबत एक पोस्ट केली आहे. 

"अरविंद केजरीवाल यांना गंभीर डायबीटीस आहे. आरोग्याच्या समस्या असतानाही ते 24 तास देशसेवेत तत्पर राहिले. अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांचे वजन 4.5 किलोने कमी झाले आहे. हे खूप चिंताजनक आहे. आज त्यांना तुरुंगात टाकून भाजपा त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर संपूर्ण देश सोडा, देवही त्यांना माफ करणार नाही"  असं आतिशी यांनी म्हटलं आहे. 

अरविंद केजरीवाल यांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना औषधे देण्यात आली आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ब्लड शुगर लेव्हल मॉनिटरिंग करण्यासाठी शुगर सेन्सर देखील देण्यात आला आहे. ते दुपारी आणि रात्रीच्या जेवणात घरी बनवलेले अन्न खात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.  पत्नी सुनीता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील ते बोलले आणि त्यांच्या वकिलाला देखील भेटले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारण