शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

किमान दोन सरचिटणीसांना हटवा- दुर्रानी यांची मागणी काँग्रेसमध्ये मतभेद : संघटनात्मक बदलाच्या मागणीला जोर

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता उघड उघड तलवारबाजी सुरू झाली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसमधील संघर्ष जाहीररीत्या चव्हाट्यावर आणला होता. आता माजी सरचिटणीस अनिस दुर्रानी यांनी किमान दोन सरचिटणीसांना हटवा, अशी मागणी करीत अंतर्गत संघर्षात भर घातली आहे.

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता उघड उघड तलवारबाजी सुरू झाली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसमधील संघर्ष जाहीररीत्या चव्हाट्यावर आणला होता. आता माजी सरचिटणीस अनिस दुर्रानी यांनी किमान दोन सरचिटणीसांना हटवा, अशी मागणी करीत अंतर्गत संघर्षात भर घातली आहे.
अलीकडील निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार असलेल्या किमान दोन सरचिटणीसांना हटविण्याची मागणी करताना त्यांनी जनार्दन द्विवेदी आणि मधुसुदन मिस्त्री यांना लक्ष्य बनविले. मे २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे दोघे जबाबदार असल्याचे त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. पक्षाच्या पराभवाबद्दल केवळ प्रदेश नेत्यांनाच जबाबदार धरले जात असून त्यांची उचलबांगडी केली जाते, दुसरीकडे सरचिटणीसांना किरकोळ बदल करीत कायम ठेवले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
------------------
काय म्हणाले होते द्विवेदी?
लोकसभेच्या निवडणुकीआधी जनार्दन द्विवेदी यांनी अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य घटकांच्या नोकरीतील आरक्षणाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती, त्यामुळे काँग्रेसच्या व्होटबँकेला हादरा बसला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीयत्वाचे प्रतीक असे संबोधत मुक्तकंठाने स्तुती केली होती. त्यामुळे दिल्लीतील पारंपरिक मतदारांवर प्रभाव पडला, असेही दुर्रानींनी पत्रात म्हटले. द्विवेदी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत बेजबाबदार तुलनात्मक विधाने करीत काँग्रेसनिष्ठ कार्यकर्त्यांना चुकीचा संदेश दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
-------------------
उपोषणाला बसणार
या दोन नेत्यांना हटविले जात नाही तोपर्यंत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर उपोषणाची परवानगी द्यावी. काँग्रेसचे दुसरे सरचिटणीस मधुसुदन मिस्त्री यांनी उत्तर प्रदेशातील सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांचा राजकारणाशी संबंध नसल्यामुळे पक्षाची स्थिती आणखी खालावत गेली, या शब्दांत दुर्रानी यांनी तोफ डागली.