शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

"भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेणार", संत परमहंस यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 8:23 PM

Hindurashtra News: काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती. मात्र चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते.

अयोध्या - अयोध्येतील तपस्वी छावणीमधील संत परमहंस यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. रविवारी तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संत परमहंस यांनी ही घोषणा केली आहे. १ ऑक्टोबर रोजी देशातील नागरिकांची एक मोठी सनातन धर्मसंसद आयोजित होईल. यामध्ये भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. संत परमहंस यांनी सांगितले की, यावर जर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही तर २ ऑक्टोबर रोजी ते शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतील.

काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती. मात्र चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते. त्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना थांबवले होते. दरम्यान, आता संत परमहंस यांनी एक अजून घोषणा केली आहे. जर १ ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित केले नाही तर ते २ ऑक्टोबर रोजी शरयू नदीत जलसमाधी घेतील. आता जसजशी २ ऑक्टोबर ही तारीख जवळ येत आहे तसतशा संत परमहंस यांच्या हालचालींना वेग आला आहे.

तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी सर्व संघटनांचे लोक हिंदू सनातन धर्मसंसदेचे आयोजन करतील आमि २ ऑक्टोबर रोजी जर आमचे म्हणणे ऐकले गेले नाही तर मी शरयू नदीत जलसमाधी घेईन, मी समाधी घेतल्यानंतर कदाचित माझ्या श्रद्धांजलीमध्ये मोदीजी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करतील, कारण जर हिंदू वाचला नाही तर काहीच वाचणार नाही.

त्यांनी सांगितले ज्याप्रकारे काश्मीरमध्ये धर्माच्या आधारावर घोषणा होतात. जर हिंदू राष्ट्र घोषित केले नाही तर हिंदू अल्पसंख्याक होऊन जाईल. त्यापासून वाचण्यासाठी हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. कारण हिंदू तेवढाच उदारमतवादी आहे की हिंदू राष्ट्र घोषित झाल्यावरही दुसऱ्यांना त्रास होणार नाही.  

टॅग्स :Hindutvaहिंदुत्वIndiaभारतAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी