शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

माफी नाही, थेट मृत्यूदंड; बनावट औषधे बनवणाऱ्यांविरोधात सुषमा स्वराज यांनी आणलेले विधेयक, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:15 IST

Death for fake drug-makers: बनावट कफ सिरफमुळे आतापर्यंत 20 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली: तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2003 साली एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री सुषमा स्वराज यांनी एक असे विधेयक आणले होते, ज्यामध्ये बनावट औषधे तयार करणे हे “सामूहिक हत्येचा प्रयत्न” मानले जाणार होते आणि या गुन्ह्यासाठी मृत्युदंड देण्याची तरतूद होती.

गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विषारी कफ सिरपमुळे 20 बालकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंझ देत आहेत. अशा परिस्थितीत, सुषमा स्वराज यांचे ते विधेय़क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जर त्या विधेयकाचे तेव्हा कायद्यात रुपांतरित झाले असते, तर कदाचित आज या निष्पाप जीवांचा मृत्यू टाळता आला असता.

त्या विधेयकात काय होते? 

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, “सुषमा स्वराज यांनी सांगितले होते की, बनावट औषधे तयार करणे, हा सर्वात मोठा अपराध आहे. हा गुन्हा केवळ नफेखोरीसाठी केला जातो, त्यामुळे त्यामध्ये दयेची जागाच नाही.” त्या विधेयकाला हिवाळी अधिवेशनात सादर करायचे ठरले होते, परंतु ते आधी संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आले आणि त्यानंतर ते तिथेच अडकून पडले. तज्ञांच्या मते, औषध उद्योगांच्या दबावामुळे हे विधेयक कधीच पुढे सरकले नाही.

माशेलकर समितीचा अहवाल

सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले होते की, हा प्रस्ताव आर.ए. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसींवर आधारित होता. त्याचबरोबर मंत्रिमंडळाने WTO च्या TRIPS करारानुसार पेटंट कायद्यात दुरुस्ती करण्यासही मान्यता दिली होती.

जास्त किमतीत औषध विकणेही गुन्हा

या विधेयकात औषध त्याच्या मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विकणे देखील दंडनीय अपराध ठरणार होते. सुषमा स्वराज यांनी सांगितले होते की, सरकार आरोग्य क्षेत्रात खाजगी डॉक्टरांना सरकारी आरोग्य सेवेचा भाग बनवण्याचा विचार करत आहे, जेणेकरुन उपचार अधिक परिणामकारक होतील. मात्र, ते विधेयक सभागृहात मांडले गेले नाही. जर त्या काळी हे विधेयक मंजूर झाले असते, तर औषध उद्योगावर कडक अंकुश बसला असता आणि देशभरात औषध उत्पादनासाठी सुरक्षा आणि पारदर्शकतेचे नवे मानदंड निर्माण झाले असते.

टॅग्स :Healthआरोग्यmedicinesऔषधंdoctorडॉक्टरCentral Governmentकेंद्र सरकारSushma Swarajसुषमा स्वराज