शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्रेड महादेव राऊत यांचे देहदान

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

हायकोर्ट : तरुणींवरील प्राणघातक हल्ल्यांच्या प्रकरणात भूमिकाराकेश घानोडेनागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुण मुलींविरुद्धचे गुन्हे वाढत असल्यामुळे रोड रोमिओंना धडा शिकविण्यासाठी अशा प्रकरणांत न्यायालयांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, या मताला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाठिंबा दर्शविला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणींची हत्या करणे, धारदार शस्त्राने गंभीर जखमी करणे, ...

हायकोर्ट : तरुणींवरील प्राणघातक हल्ल्यांच्या प्रकरणात भूमिका

राकेश घानोडे
नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुण मुलींविरुद्धचे गुन्हे वाढत असल्यामुळे रोड रोमिओंना धडा शिकविण्यासाठी अशा प्रकरणांत न्यायालयांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, या मताला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाठिंबा दर्शविला आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणींची हत्या करणे, धारदार शस्त्राने गंभीर जखमी करणे, ॲसिड फेकून चेहरा विद्रुप करणे अशाप्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेता गोंदिया सत्र न्यायालयाने अशा प्रकरणांत कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत नोंदवून आरोपीला भादंविच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत जन्मठेप व ३० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपीलावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या मताचे समर्थन केले.
अंकुश अशोक रामटेके (२८) असे आरोपीचे नाव असून तो गोंदिया येथील रहिवासी आहे. त्याचे शहरातीलच एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मुलीने प्रतिसाद न दिल्यामुळे तो चिडला होता. दरम्यान, मुलीचे लग्न जुळले. साखरपुड्याची तारीख निश्चित झाली. आता ती मुलगी आपल्याला मिळणार नाही या विचाराने वेडा झालेल्या आरोपीने मुलीवर धारदार चाकूने हल्ला करून तिच्या चेहरा व दोन्ही हातांवर ३२ घाव मारले. मुलीच्या उजव्या हाताचे एक आणि डाव्या हाताची ३ बोटे कटून वेगळी झाली. ही घटना १७ जानेवारी २००९ रोजी घडली होती. त्यावेळी मुलगी २१ वर्षांची होती.
--------------------
चौकट.....
आरोपीला सोडण्याची विनंती फेटाळली
आतापर्यंत ५ वर्षांची शिक्षा भोगल्यामुळे आरोपीला सोडून देण्याची विनंती त्याच्या वकिलाने केली होती. उच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. याशिवाय न्यायालयाने आरोपीचा पूर्व इतिहास चांगला असल्याने व तो स्वत:ही तरुण असल्यामुळे सत्र न्यायालयाच्या शिक्षेत बदल करून भादंविच्या कलम ३२६ (शस्त्राने मारणे) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. तरुणीला न्याय मिळण्यासाठी १० वर्षांची शिक्षा पुरेशी असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. दंडाची रक्कम तरुणीला दिली जाणार आहे.