शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

'डाटाचा गैरवापर खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:11 AM

रविशंकर प्रसाद यांचा इशारा; देशात डाटा विश्लेषणाचे आगार बनवण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली : भारताला डाटा विश्लेषणाचे आगार बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; परंतु लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी डाटाचा गैरवापर अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा आयटी व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.सीबीआयने फेसबुक, केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका व ग्लोबल सायन्स रिसर्च या संस्थांना पत्र लिहून डाटा संकलन व्यवस्थेची माहिती मागितली.या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारत डाटा विश्लेषण क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र बनावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु या डाटाचा वापर लोकशाहीवर प्रभाव टाकण्यासाठी कंपन्या करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. स्वच्छता अभियानातील एका कार्यक्रमात प्रसाद म्हणाले की डाटा फुटीप्रकरणी फेसबुकने याआधीच माफी मागून सुधार कृती करण्याचे आश्वासन दिले आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने सुरुवातीला उत्तर दिले होते, नंतर मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद नाही. त्यामुळे हे प्रकरण आम्ही तपासासाठी सीबीआयकडे पाठविले आहे.मागवला खुलासावर्षाच्या सुरुवातीला ८७ लाख वापरकर्त्यांचा डाटा फुटल्याप्रकरणी फेसबुक व केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाविरुद्ध क्षोभ निर्माण झाला होता. जगभरातील सरकारांकडून याबाबत कंपन्यांवर टीकेची झोड उठली होती.फेसबुक युजर्सचा डाटा अनेक देशांतील निवडणुकांसाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. सावध झालेल्या भारत सरकारने दोन्ही कंपन्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या. सीबीआयनेही आता या कंपन्यांकडून त्यांचे म्हणणे मागविले आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट