शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

हिमाचलमधील संकट टळले; जनादेश वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची काँग्रेसने केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:23 IST

हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिमला, नवी दिल्ली : मुख्यमंत्र्यांवर नाराज मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे उत्तर भारतातील काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशातील राजकीय संकट अधिक गहिरे झाले होते. मात्र विक्रमादित्य सिंह  यांनी राजीनामा मागे घेतल्याने राज्यातील राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत.  पक्षश्रेष्ठींनी दोन निरीक्षकांना राज्याच्या दौऱ्यावर पाठवले असून जनादेश वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील, असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, हिमाचलच्या विधानसभेत अध्यक्षांनी भाजपचे १५ आमदार निलंबित केले आहेत.

  हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यानंतर हरयाणाच्या पंचकुला येथे रवाना झालेले सहा आमदार बुधवारी शिमल्यात परतले. त्यात तीन अपक्ष आमदारांचाही समावेश होता.

विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्प मंजूर करताना गोंधळ झाला. अध्यक्ष पठानिया यांनी जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले.  काँग्रेसने राज्य विधानसभेत आपले बहुमत गमावले आहे, अशी भूमिका घेत भाजपने अर्थसंकल्पावर मतदानाची मागणी केली होती. परंतु, दुपारी भाजपचा एकही सदस्य उपस्थित नसताना वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने हे संकट तूर्तास टळले.

जनादेशाचा विश्वासघात होऊ देणार नाहीn‘काँग्रेस कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही कारण पक्षाला आमचे प्राधान्य आहे. सरकार असे पडत नाही. जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे. n‘तो माघारी घेण्याचा अधिकार जनतेला आहे. हिमाचल प्रदेशात जनादेशाचा विश्वासघात होऊ देणार नाही,’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी सांगितले.

पाच वर्षे सरकार चालवणारपक्ष श्रेष्ठींनी मला किंवा इतर कोणालाही राजीनामा मागितला नाही. राज्यातील भाजप नेत्यांनी ज्या प्रकारचे काम केले, त्यांना आपल्याच लोकांवर विश्वास नाही. सीआरपीएफ तैनात करण्यात आले. हरयाणा पोलिस तैनात करण्यात आले. हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. पण, हिमाचलची जनता आमच्यासोबत आहे. आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही नक्कीच हिमाचलचे सरकार पाच वर्षे चालवू. - सुखविंदर सिंह सुखू, मुख्यमंत्री

भाजपला जनादेश चिरडायचा आहे भाजपला राज्याला राजकीय संकटात ढकलायचे आहे. २५ आमदार असलेला भाजप जर ४३ आमदारांच्या बहुमताच्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जनतेचा अधिकार ठेचायचा असल्याचे दिसून येते. भाजप पैशाची ताकद, यंत्रणांची ताकद आणि केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत आहे.- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस