शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

हिमाचलमधील संकट टळले; जनादेश वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची काँग्रेसने केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:23 IST

हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिमला, नवी दिल्ली : मुख्यमंत्र्यांवर नाराज मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे उत्तर भारतातील काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशातील राजकीय संकट अधिक गहिरे झाले होते. मात्र विक्रमादित्य सिंह  यांनी राजीनामा मागे घेतल्याने राज्यातील राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत.  पक्षश्रेष्ठींनी दोन निरीक्षकांना राज्याच्या दौऱ्यावर पाठवले असून जनादेश वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील, असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, हिमाचलच्या विधानसभेत अध्यक्षांनी भाजपचे १५ आमदार निलंबित केले आहेत.

  हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यानंतर हरयाणाच्या पंचकुला येथे रवाना झालेले सहा आमदार बुधवारी शिमल्यात परतले. त्यात तीन अपक्ष आमदारांचाही समावेश होता.

विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्प मंजूर करताना गोंधळ झाला. अध्यक्ष पठानिया यांनी जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले.  काँग्रेसने राज्य विधानसभेत आपले बहुमत गमावले आहे, अशी भूमिका घेत भाजपने अर्थसंकल्पावर मतदानाची मागणी केली होती. परंतु, दुपारी भाजपचा एकही सदस्य उपस्थित नसताना वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने हे संकट तूर्तास टळले.

जनादेशाचा विश्वासघात होऊ देणार नाहीn‘काँग्रेस कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही कारण पक्षाला आमचे प्राधान्य आहे. सरकार असे पडत नाही. जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे. n‘तो माघारी घेण्याचा अधिकार जनतेला आहे. हिमाचल प्रदेशात जनादेशाचा विश्वासघात होऊ देणार नाही,’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी सांगितले.

पाच वर्षे सरकार चालवणारपक्ष श्रेष्ठींनी मला किंवा इतर कोणालाही राजीनामा मागितला नाही. राज्यातील भाजप नेत्यांनी ज्या प्रकारचे काम केले, त्यांना आपल्याच लोकांवर विश्वास नाही. सीआरपीएफ तैनात करण्यात आले. हरयाणा पोलिस तैनात करण्यात आले. हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. पण, हिमाचलची जनता आमच्यासोबत आहे. आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही नक्कीच हिमाचलचे सरकार पाच वर्षे चालवू. - सुखविंदर सिंह सुखू, मुख्यमंत्री

भाजपला जनादेश चिरडायचा आहे भाजपला राज्याला राजकीय संकटात ढकलायचे आहे. २५ आमदार असलेला भाजप जर ४३ आमदारांच्या बहुमताच्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जनतेचा अधिकार ठेचायचा असल्याचे दिसून येते. भाजप पैशाची ताकद, यंत्रणांची ताकद आणि केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत आहे.- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस