शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 4:27 AM

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.

अलिबाग : देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना वेळीच हिसका दाखवला पाहिजे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या अधिवेशनाचे सुप शनिवारी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात वाजले त्याप्रसंगी पटेल बोलत होते.संभाजी ब्रिगेड ही सामाजिक विचारांची अशी चळवळ आहे, जी राजकारणाला कलाटणी देऊ शकते. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापसात न भांडता आपला शत्रू कोण आहे, हे ओळखून रयतेचे राज्य आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्यावर प्रकाश टाकल्याने त्यांच्याविरोधात कारस्थान केल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट करून वर्मा यांना क्लीन चिट दिली, तर आस्थाना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.देशाचा खरा इतिहास बदलणाºयांना संभाजी ब्रिगेडने रोखण्याचे काम केले आहे. त्यामुळे इतिहास आणि संविधान बदलण्याची भाषा करणाºयांना आता रोखण्याची गरज असल्याचे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. भगवा आणि तिरंगा वापरण्याची परवानगी कोणलाही देण्यात येऊ नये. झेंड्याच्या नावावर राज्य जिंकणाºयांना छत्रपतींचा विसर पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अभिजन विरुद्ध बहुजन असा लढा उभा राहिला आहे. एकजुटीने ही लढाई लढण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी