शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Coronavirus: कोरोना मुक्तीनंतरही बारा आठवडे काळजीचे, ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 8:44 AM

Coronavirus in India: कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तब्येतीची नीट काळजी घेण्याकडेही रुग्णांनी लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्याची काही लक्षणे बराच काळ मागे उरतात. अनेकांना श्वास घेण्यात अडचणी येतात. काहींच्या फुप्फुसात दोष निर्माण होतो. बरे झाल्यानंतरही त्या व्यक्तींना अनेक आठवडे खोकला, सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सतत थकवा जाणवतो किंवा सांधेदुखी सुरू होते. कोरोनाचा संसर्ग जसा कमी होईल तसे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढत जाईल. त्या लोकांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे नवे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहील. गावांमध्ये कोनारोला रोखण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लहान मुलांना फार झळ पोहोचली नव्हती. मुलांना कोरोना झाला तरी त्याची लक्षणे खूप कमी असतात. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका आहे, असे सांगितले जात आहे. मात्र हा संसर्ग कमी की जास्त प्रमाणात होईल, हे आताच सांगता येणार नाही.नव्या कोरोना रुग्णांत घट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ७ मे रोजी देशात एकाच दिवसात सर्वाधिक ४.१४ लाख नवे कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र त्यात नंतर घट झाली. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे २.२२ लाख नवे रुग्ण आढळले. गेल्या चाळीस दिवसांतील हा नीचांक आहे. दर दिवशी कोरोनाचे १०० रुग्ण आढळतात, अशा जिल्ह्यांची संख्या ४ मे रोजी ५३१ होती. ती आता ४३१ पर्यंत खाली घसरली आहे. 

बरे होणाऱ्यांची संख्या अधिकनव्या रुग्णांच्या संख्येत घट होण्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ३ मे रोजी ८१.७ टक्के होते. गेल्या ११ दिवसात बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. २७ राज्यांत सध्या ही स्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य