शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Coronavirus : ३६ देशांतील प्रवाशांना भारतात येण्यास तात्पुरती प्रवेशबंदी, ११ देशांतून येणाऱ्यांना एकांतवास बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:10 IST

प्रवेशबंदी केलेले देश वगळता ओव्हरसीज सिटिझन आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांनी भारतात येण्यासाठी व्हिसाकरता नव्याने संबंधित भारतीय दूतावासाकडे अर्ज करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या फैलावामुळे ३६ देशांतील नागरिकांना भारताने तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे. तर ११ देशांमधून भारतात येणा-या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहाणे बंधनकारक आहे.यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, प्रवेशबंदी केलेले देश वगळता ओव्हरसीज सिटिझन आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांनी भारतात येण्यासाठी व्हिसाकरता नव्याने संबंधित भारतीय दूतावासाकडे अर्ज करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. ज्या ३६ देशांतील प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे त्यामध्ये आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपिब्लक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आईसलंड, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिटेनस्टिन, लिथुआनिया, लक्झेमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्कस्थान, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. या देशांतील प्रवाशांसाठी लागू केलेली प्रवेशबंदी १२ मार्चपासून तर फिलिपिन्स, मलेशिया, अफगाणिस्तानच्या प्रवाशांसाठीची प्रवेशबंदी १७ मार्चपासून अंमलात आली आहे. तसेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान, कुवैत, चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स येथून परतणाऱ्यांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. दक्षिण कोरिया, इटली येथून परतणाºया प्रवाशांनी कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र स्वत:सोबत आणणे बंधनकारक आहे.26000जण आखाती देशांतून परतणारकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतून भारतामध्ये येत्या दोन आठवड्यांच्या काळात २६ हजार लोक येण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये बहुतांश भारतीय नागरिक असणार आहेत. या हजारो लोकांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यापासून अन्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आता तयारी सुरू केली आहे.संयुक्त अरब अमिरती, कुवेत, कतार, ओमानसारख्या आखाती देशांतून दररोज वीस प्रवासी विमाने मुंबई विमानतळावर येत असतात. तेथून मग हे प्रवासी आपापल्या मुक्कामी जातात.या देशांतून येणाºया सर्व प्रवाशांना १४ दिवस सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा या प्रवाशांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जाणाºयांपैकी बहुतांश लोक हे कुशल कामगार आहेत.क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक1कोरोनाच्या साथीमुळे ते आखाती देशांतून मायदेशी परतत आहेत. त्यापैकी ज्यांची मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपास घरे आहेत त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये १४ दिवस राहाण्याची व या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.2मात्र जे मुंबईत राहात नाहीत व ज्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, अशांना सरकारी रुग्णालये किंवा अन्य ठिकाणी उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मरोळ विभागात सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन उभारण्यात आले आहे.3सरकारने उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये ७०० खाटांची सोय करण्यात आली आहे असे राज्य सरकारने सांगितले. शहरातील विविध ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालये यांच्यामध्येही सरकारने क्वारंटाइन सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.1कोरोनाच्या साथीमुळे ते आखाती देशांतून मायदेशी परतत आहेत. त्यापैकी ज्यांची मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपास घरे आहेत त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये १४ दिवस राहाण्याची व या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.2मात्र जे मुंबईत राहात नाहीत व ज्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, अशांना सरकारी रुग्णालये किंवा अन्य ठिकाणी उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मरोळ विभागात सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन उभारण्यात आले आहे.3सरकारने उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये ७०० खाटांची सोय करण्यात आली आहे असे राज्य सरकारने सांगितले. शहरातील विविध ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालये यांच्यामध्येही सरकारने क्वारंटाइन सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत