शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ३६ देशांतील प्रवाशांना भारतात येण्यास तात्पुरती प्रवेशबंदी, ११ देशांतून येणाऱ्यांना एकांतवास बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:10 IST

प्रवेशबंदी केलेले देश वगळता ओव्हरसीज सिटिझन आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांनी भारतात येण्यासाठी व्हिसाकरता नव्याने संबंधित भारतीय दूतावासाकडे अर्ज करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या फैलावामुळे ३६ देशांतील नागरिकांना भारताने तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे. तर ११ देशांमधून भारतात येणा-या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहाणे बंधनकारक आहे.यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, प्रवेशबंदी केलेले देश वगळता ओव्हरसीज सिटिझन आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांनी भारतात येण्यासाठी व्हिसाकरता नव्याने संबंधित भारतीय दूतावासाकडे अर्ज करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. ज्या ३६ देशांतील प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे त्यामध्ये आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपिब्लक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आईसलंड, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिटेनस्टिन, लिथुआनिया, लक्झेमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्कस्थान, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. या देशांतील प्रवाशांसाठी लागू केलेली प्रवेशबंदी १२ मार्चपासून तर फिलिपिन्स, मलेशिया, अफगाणिस्तानच्या प्रवाशांसाठीची प्रवेशबंदी १७ मार्चपासून अंमलात आली आहे. तसेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान, कुवैत, चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स येथून परतणाऱ्यांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. दक्षिण कोरिया, इटली येथून परतणाºया प्रवाशांनी कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र स्वत:सोबत आणणे बंधनकारक आहे.26000जण आखाती देशांतून परतणारकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतून भारतामध्ये येत्या दोन आठवड्यांच्या काळात २६ हजार लोक येण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये बहुतांश भारतीय नागरिक असणार आहेत. या हजारो लोकांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यापासून अन्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आता तयारी सुरू केली आहे.संयुक्त अरब अमिरती, कुवेत, कतार, ओमानसारख्या आखाती देशांतून दररोज वीस प्रवासी विमाने मुंबई विमानतळावर येत असतात. तेथून मग हे प्रवासी आपापल्या मुक्कामी जातात.या देशांतून येणाºया सर्व प्रवाशांना १४ दिवस सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा या प्रवाशांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जाणाºयांपैकी बहुतांश लोक हे कुशल कामगार आहेत.क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक1कोरोनाच्या साथीमुळे ते आखाती देशांतून मायदेशी परतत आहेत. त्यापैकी ज्यांची मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपास घरे आहेत त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये १४ दिवस राहाण्याची व या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.2मात्र जे मुंबईत राहात नाहीत व ज्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, अशांना सरकारी रुग्णालये किंवा अन्य ठिकाणी उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मरोळ विभागात सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन उभारण्यात आले आहे.3सरकारने उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये ७०० खाटांची सोय करण्यात आली आहे असे राज्य सरकारने सांगितले. शहरातील विविध ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालये यांच्यामध्येही सरकारने क्वारंटाइन सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.1कोरोनाच्या साथीमुळे ते आखाती देशांतून मायदेशी परतत आहेत. त्यापैकी ज्यांची मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपास घरे आहेत त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये १४ दिवस राहाण्याची व या कालावधीत सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.2मात्र जे मुंबईत राहात नाहीत व ज्यांच्यात कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, अशांना सरकारी रुग्णालये किंवा अन्य ठिकाणी उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मरोळ विभागात सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन उभारण्यात आले आहे.3सरकारने उभारलेल्या क्वारंटाइनमध्ये ७०० खाटांची सोय करण्यात आली आहे असे राज्य सरकारने सांगितले. शहरातील विविध ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालये यांच्यामध्येही सरकारने क्वारंटाइन सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत