शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

CoronaVirus News: लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये १२.२ कोटी लोक बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:00 AM

देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-धंदे बंद ठेवावे लागल्याने एप्रिल महिन्यामध्ये देशभरात १२.२ कोटी लोक बेकार झाले आहेत, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संघटनेने म्हटले आहे. बेकार झालेल्या लोकांमध्ये फेरीवाले, बांधकाम मजूर, रिक्षाचालक आदींचा समावेश आहे.

या संघटनेने यासंदर्भात नुकतीच एक पाहणी केली होती. आयपीइ ग्लोबल या संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक अश्वजित सिंग यांनी सांगितले की, देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत. बेकारीच्या प्रमाणात यंदाच्या वर्षी घट होण्याची शक्यता नाही. भारतात कोरोनाच्या संसर्गापेक्षा भूकबळींची संख्या जास्त असेल असेही ते म्हणाले.

देशातील गरिबातल्या गरीब माणसाला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे आश्वासन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन लागू करावे लागणे ही मोदीसरकारसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीची गोष्ट ठरू शकते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत विजय मिळवून मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. देशातील गरिबांसाठी गॅस सिलिंडर, वीज, गृहबांधणी अशा योजना पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीत राबविल्याने नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकांत पुन्हा घवघवीत यश मिळाले होते.गरीबीचे प्रमाणही वाढणार

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या बेकारीमुळे आणखी १०.४ कोटी लोक पुन्हा दारिद्रयरेषेखाली ढकलले जाणार आहेत. त्यामुळे देशात गरीबांची संख्या वाढणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात गरीबीचे प्रमाण कमी होऊन गरीबांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशांतून भारताचे नाव वगळले जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण लॉकडाऊनमुळे आता भारत पुन्हा गरीबीच्या भोवºयात सापडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरीIndiaभारत