शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक; IIT मधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:48 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असणाऱ्या जोधपूर (Jodhpur) मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी राज्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद ही जोधपूरमध्येच झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जोधपूर आयआयटी (IIT) कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. 

विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे.  25 जण पॉझिटीव्ह आढळल्याचं उघड होताच प्रशासनाने हा परिसर कटेंनमेंट झोन (Containment Zone) जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, शहरात 520 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 141 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या आकडेवारीवरुन शहरातील कोरोनाच्या वाढत्या स्पीडचा अंदाज येऊ शकेल. 

कोरोना संक्रमणाचा शहरातील दर पुन्हा एकदा 27 टक्के झाला आहे. आयआयटीमधील 25 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. आयआयटी ब्लॉक जी 3 मधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आता त्यांच्या फ्लॅटमध्येच राहतील. तसंच त्यांना पूर्वपरवानगीशिवाय  बाहेर पडता येणार नाही. आयआयटी परिसरात बनवण्यात आलेले सुपर आयसोलेशन सेंटर देखील कंटेनमेंट झोनमध्येच आहे. जोधपूर शहरात एकूण 9 झोन आहेत. तर ग्रामीण भागात 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद

होळीच्या दिवशी दिवसभरात 214 जणांना कोरोनाची लागण झाली. जोधपूरमध्ये गेल्या 3 दिवसात 455 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 15 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतRajasthanराजस्थानStudentविद्यार्थीTeacherशिक्षक