शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

Coronavirus: पुन्हा ‘बंद’कडे वाटचाल; कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:23 AM

२४ तासांत १८,५५२ रुग्ण । बाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत चालला आहे, त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार ५५२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३ झाला आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळले आहेत. मृत्यूसंख्याही २४ तासांत ३८४ ने वाढल्याने एकूण आकडा १५ हजार ६८५ झाला आहे.

देशात रुग्णांची संख्या एक लाख होण्यास १०० दिवस लागले होते. पुढील ३९ दिवसांत रुग्णांची संख्या ५ लाखांवर गेली. म्हणजेच ३९ दिवसांत तब्बल ४ लाख रुग्ण वाढले. १ जून ते २७ जून या काळात वाढलेल्या रुग्णांची संख्याच ३ लाख १८ हजार ४१८ इतकी आहे. हा वेग असाच राहिल्यास पुढील शनिवारपर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेलेली असेल, असे दिसते.

या पाच लाखांपैकी १ लाख ५२ हजार रुग्ण महाराष्ट्रात असून, दिल्लीत ७७ हजार, तमिळनाडूमध्ये ७४ हजार आणि गुजरातमध्ये ३० हजार रुग्णसंख्या झाली आहे. उत्तर प्रदेशातही रुग्णसंख्या वाढून २० हजारांवर गेली आहे. याखेरीज सात राज्यांत रुग्णसंख्या १० हजारांच्यावर आहे. महाराष्ट्रात ७१०६, दिल्लीत २४९२, गुजरातमध्ये १७७१ तर तमिळनाडूत ९५७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे.

समाधानाची बाब ही की कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात वाढत असून, ते ५८.१३ टक्के झाले आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ८८९ जण बरे होऊ न घरी परतले आणि सध्या १ लाख ९७ हजार ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आली.पुन्हा ‘बंद’कडे वाटचालरुग्णांमध्ये रोज प्रचंड वाढ होत असल्यामुळे रेल्वेसेवा १२ आॅगस्टपर्यंत, तर आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला, हे उघड आहे. शाळा व महाविद्यालये कधी सुरू करायची, हे ठरवण्यात राज्यांना अडचणी येत असून, जवळपास सर्वच परीक्षा केंद्र व राज्य सरकार यांनी रद्द केल्या आहेत. याशिवाय सर्व मोठ्या शहरांत अनेक वस्त्या सील करण्यात आल्या असून, काही ठिकाणी तर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी सुरू झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी स्वत:हून बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक