शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 09:41 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. मात्र आता केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाने होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल केले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. धोका वाढत असून देशातील रुग्णसंख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. मात्र आता केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाने होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल केले आहेत. 

देशातील रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येत नाही मात्र चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता कोणतंही लक्षण नसलेल्या रुग्णांचा समावेश हा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये करण्यात येऊ शकतो. तसेच एचआयव्ही, कॅन्सर यासारख्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती होम आयसोलेशनसाठी योग्य नसल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, मधमेह, हृदय आणि किडनी संबंधीत आजार असलेल्या मंडळींना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल असं देखील म्हटलं आहे. 

कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात येते. कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार, लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत केले जाते. त्यानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड रुग्णालयात येथे दाखल केले जाते. मात्र आता होम आयसोलेशनच्या नियमांत थोडा बदल करण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना लक्षण दिसून आल्यानंतर 10 दिवसांनी सोडण्यात येईल मात्र तीन दिवस ताप न आल्यास हे केलं जाईल. तसेच त्यानंतर त्यांना घरी एकटं राहण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये  त्यांनी पुढील सात दिवस आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यावे. होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यावर कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही. मात्र हे फक्त लक्षण नसलेल्या तसेच सौम्य आणि अति सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी लागू असल्याचं सुधारीत मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

होम आयसोलेशनच्या कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत सतत कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्यांना वेळोवळी प्रकृतीची माहिती द्या. त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या. रुग्णाच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड असणं महत्त्वाचं आहे. ब्ल्यूटूथ व वाय-फायद्वारे सतत कनेक्ट राहायला हवं. होम आयसोलेशन दरम्यान श्वास घेण्यास त्रास झाला अथवा इतरही काही त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी आणि त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अशा रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdoctorडॉक्टरDeathमृत्यू