शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : धोका वाढला! 4 दिवसांत 400 नवे रुग्ण; 'या' राज्यात येणारी चौथी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 13:01 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचं आपल्या गावी जाणं हे धोकादायक ठरत आहे.

पाटणा - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील  कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत आहे. सोमवारी एक लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी तब्बल पाच हजार 611 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 3303 वर पोहोचली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचं आपल्या गावी जाणं हे धोकादायक ठरत आहे. बिहारमध्ये याचा वाईट परिणाम आता दिसून येत आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये बिहारमध्ये तब्बल 400 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इतर राज्यांमधून विशेष ट्रेनद्वारे आलेल्या 8337 स्थलांतरीत मजुरांचे नमुने घेण्यात आले. यापैकी 651जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. मात्र या आकडेवारीनुसार बिहारमध्ये येणारी प्रत्येक चौथी व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

बिहारमध्ये दिल्लीतून आलेल्या 1362 नागरिकांचे नमुने घेण्यात आले. यापैकी 835 नमुन्यांची तपासणी झाली. यामध्ये 218 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जी 26 टक्के इतकी आहे. अशीच स्थिती पश्चिम बंगालमधून येणाऱ्या मजुरांबाबत देखील आहे. बंगालमधून येणारे 12 टक्के मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर महाराष्ट्रातून येणारे 11 टक्के मजूर पॉझिटिव्ह आढळत आहेत. हरियाणातून येणारे 9 टक्के मजूर करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. 

बिहारमध्ये मजूर आपल्या गावी मोठ्या संख्येने परतत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 8 दिवसांसाठी योजना बनवण्यात आली आहे. यानुसार 26 मेपर्यंत 505 विशेष ट्रेन बिहारमध्ये दाखल होणार आहेत. विविध राज्यांमधून हे मजूर येणार आहेत. यासाठी बिहारचे प्रशासन राज्यांशी संपर्क साधत आहेत. तसेच बिहारमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात या राज्यांतून येत आहेत. यासोबतच दक्षिणेतील राज्यांतूनही मजूर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप

कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान

CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...

CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारIndiaभारतDeathमृत्यूdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा