शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

coronavirus: कोरोना रोखण्यात महाराष्ट्र सर्वात मागे, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारची कामगिरी सर्वोत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 06:22 IST

coronavirus Update : उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांनी कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर. केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक जीव वाचवले.

- विकास झाडेनवी दिल्ली : उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांनी कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर. केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक जीव वाचवले. महाराष्ट्रात मात्र कोरोना प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वात निकृष्ट कामगिरी झाली. आर्थिक सर्वेक्षण अहवालातील हा निष्कर्ष महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवणारा ठरला आहे.महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ४८,५०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील एकूण १८ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोविड-१९ ची बाधा झाली. अर्थसंकल्पाच्या पूर्वी देशाची आर्थिक परिस्थिती दर्शविणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारने जाहीर केलाआहे.या अहवालात कोरोना महामारीला अर्थव्यवस्थेच्या नुकसानीसाठी जबाबदार धरले आहे. यामध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याच्या विविध राज्यांच्या प्रयत्नांचीही नोंद घेतली आहे. कोरोना रोखणे आणि मृत्यूची संख्या थांबविण्यात महाराष्ट्र सर्वात खालच्या स्थानावर असल्याचे नोंदविण्यात आले. लसीकरण सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कोरोना कालावधीत तेलाचे उत्पादन ६ टक्के आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ५ टक्के घट झाली असल्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये तेलाचे उत्पादन ३४.२० दशलक्ष मेट्रिक टन होते. तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये ते १२.१७ दशलक्ष मेट्रिक टन इतके मर्यादित झाले. त्याचप्रमाणे सन २०१९ मध्ये नैसर्गिक वायू उत्पादन ३२.८७ अब्ज घनमीटर होते. आर्थिक वर्ष २०२० मध्ये ते ३१.१८ अब्ज घनमीटर इतकेच होते.  

देशात कोरोना बळींची संख्याही घटू लागली नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी घटली असून, हे प्रमाण अवघे १.४० टक्के झाले आहे. या संसर्गातून १ कोटी ४ लाख ९६ हजार लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.१६ टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो १.४३ टक्के झाला.देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०८,०२,५९१ असून त्यापैकी १,०४,९६,३०८ जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे १२,४०८ नवे रुग्ण आढळले व १५,८५३ जण बरे झाले. शुक्रवारी आणखी १२० जण मरण पावले असून, बळींची संख्या १,५४,८२३ झाली आहे. देशात ४९,५९,४४५ जणांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १,५१,४६० आहे. नव्या विषाणूचा स्पेनमध्ये द. आफ्रिकेतून शिरकावदक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे स्पेनमध्ये आतापर्यंत दोन जण बाधित झाले आहेत. या देशाने ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्या प्रवाशांवर तात्पुरती प्रवेशबंदी घातली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारGujaratगुजरात