शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी 'गुगल'ची धाव, सुंदर पिचाईंकडून 'गिव्ह इंडिया'ला ५ कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:14 IST

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी याआधी गुगलने ८० कोटी डॉलरची मदत करण्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी 'गिव्ह इंडिया'ला (Give India) पाच कोटी रुपये दिले आहेत. 'गिव्ह इंडिया'ने यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी गुगलकडून पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल सुंदर पिचाई यांचे आभार मानले आहेत.

जगभरात कोरोना व्हायसरन थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी याआधी गुगलने ८० कोटी डॉलरची मदत करण्याची घोषणा केली होती. यामध्ये एनजीओ आणि बँकांसाठी २० कोटी डॉलरचा समावेश आहे, ज्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांसाठी मदत केली जाणार आहे.

भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे 'गिव्ह इंडिया'ने सध्या देशातील गरजूंना आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांना मदत करण्यासाठी अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत २० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

देशातील मोठ्या कंपन्याही कोरोनाच्या लढ्यात सामील झाल्या आहेत.Tata Trusts and Tata Sons ने १५०० कोटी रुपये दिले आहेत. तर विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायजेस लिमिडेट आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशनने एकूण ११२५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

दरम्यान, सुंदर पिचाई यांच्यासह इतर आयटी कंपन्यांनी कोरोना कोरोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटर इंडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी यांनीही कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्या खासगी संपत्तीतून एक अरब डॉलर देण्याची घोषणा केली होती. याशिवाय, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनीही ३० मिलीयन डॉलर इतका निधी दिला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoogleगुगलSundar Pichaiसुंदर पिचई