शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनापासून वाचवण्यासाठी आल्या पऱ्या, लोकांना वाटल्या खऱ्या, दर्शनासाठी जमली हजारोंची गर्दी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:32 IST

Coronavirus in India: कोरोनाकाळात समाजामध्ये अफवाही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अंधविश्वासामुळे लोकही अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत.

भोपाळ - गेल्या सव्वा वर्षापासून देशात कोरोनाच्या साथीचा फैलाव सुरू आहे. कोट्यवधी लोकांना आजारी पाडणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या या विषाणूवर अद्याप हमखास असे औषध सापडलेले नाही. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस ही परिणामकारक ठरत असल्याने लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या कोरोनाकाळात समाजामध्ये अफवाही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अंधविश्वासामुळे लोकही अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील राजगड मध्ये घडला आहे. (Angels came to save from Coronavirus, people thought it was real, thousands of people gathered to see)

कोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी दोन पऱ्या आल्या आहेत, अशी अफवा मध्य प्रदेशमधील राजगड येथील चाटूखेडा गावामध्ये पसरली. त्यानंतर या पऱ्यांच्या दर्शनासाठी हजारो लोकांची गर्दी जमली. यावेळी जमलेल्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही उल्लंघन केले. येथील लोकांना गावातील दोन महिलांच्या शरीरामध्ये देवपऱ्या आल्याचे सांगितले. या पऱ्यांच्या हातातून जो कुणी आपल्या अंगावर पाणी शिंपडून घेईल. त्याला कोरोना होणार नाही, असा दावा करण्यात आला. त्यामुळे या देवीपऱ्यांकडून पवित्र पाणी शिंपडून घेण्यासाठी घराघरांमधून लोक बाहेर पडले. 

बघता बघता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला. जमलेले लोक कोरोनाबाबतच्या कुठल्याही नियमांचे पालन करत नव्हते. तसेच त्यांच्यापैकी अनेकांनी मास्कही लावला नव्हता. तसेच सोशल डिस्टंसिंगचेही ते पालन करत नव्हते.  अखेर या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी लोकांना तिथून हटवले आणि पऱ्या असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत