शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

नांदेडमधून पंजाबला गेलेले १७० भाविक कोरोना पॉझिटिव्ह, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 11:58 AM

नांदेड येथून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कोरोना चाचणी केली नाहीया प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

चंदिगड - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर, प्रवासी आणि भाविक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा व्यक्तींना त्या्ंच्या घरी पाठवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अशा प्रकारचे स्थलांतर हे एकप्रकारे नवे संकट ठरण्याची शक्यता आहे. नुकतेच महाराष्ट्रातील नांदे़ड येथे अडकलेल्या हजारो शीख भाविकांना पंजाब सरकारने विशेष बसमधून आपल्या राज्यात परत नेले होते. मात्र या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे. त्यातच पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकारबाबत महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

लॉकडाऊनदरम्यान अकाली दलानेच नांदेड येथे अडकलेल्या भाविकांचा प्रश्न उपस्थित केला होता. नांदेडहून भाविक पंजाबमध्ये परतल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली नाही. तसेच त्यांना क्वारेंटाइन करण्याबाबतही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे या चुकीबद्दल आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अकाली दलाच्या नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, देशातील इतर काही राज्यांप्रमाणे पंजाबमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPunjabपंजाबNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र