शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

मोदींना बदनाम करण्याचा होता कट

By admin | Updated: March 11, 2016 03:15 IST

इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता

नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत गुरुवारी केला आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल,असेही स्पष्ट केले.इशरत ही लष्कर-ए-तोयबा या संघटनेची दहशतवादी होती, असे प्रथम सांगण्यात आले होते. नंतर सरकारने दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका बदलली. ही दोन्ही प्रतिज्ञापत्रे कुठल्या परिस्थितीत सादर करण्यात आली याची गृहमंत्रालय चौकशी करीत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. या प्रकरणातील काही दस्तावेज गहाळ झाले आहेत. परंतु मंत्रालय स्तरावर अंतर्गत शोध मोहीम सुरू असून यासंदर्भात पुरावे गोळा करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले. लोकसभेत काही सदस्यांनी लक्षवेधीद्वारे इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्रात कथित बदलासंदर्भात लक्षवेधी दाखल केली होती. त्यावरील चर्चेला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, इशरत ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न तत्कालीन संपुआ सरकारने केला. आपल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने हे स्वीकारले होते. पण महिनाभरानंतर प्रतिज्ञापत्र बदलण्यात आले. मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या साक्षीमुळेही इशरतचे लष्करशी संबंध होते हे सिद्ध झाले आहे. दहशतवादाच्या मुद्यावर राजकारण होऊ नये असे आवाहन करतानाच या समस्येकडे कदापि दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)