शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 3:58 PM

कधी कधी असे वाटते की काँग्रेसने भाजपासोबत युती केली आहे. कारण हा पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी काहीच करत नाहीय. - गुलाम नबी आझाद

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

कधी कधी असे वाटते की काँग्रेसने भाजपासोबत युती केली आहे. कारण हा पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी काहीच करत नाहीय. आधी काँग्रेसमधील व्यवस्थेत बदल करण्यासाठी २३ नेते लढत होते. परंतु नेतृत्व काहीच ऐकत नव्हते. जेव्हा मुद्दे काढले गेले तेव्हा त्यांनी सांगितले होते की ते भाजपासोबत चर्चा करत आहेत. कधी कधी मला वाटते की काँग्रेसला स्वत:लाच भाजपा जिंकावी अशी इच्छा असेल, असे आझाद म्हणाले. 

कोणताही पक्ष सत्तेत आला की त्याच्यासमोर गरीबी, बेरोजगारी आणि महागाई या प्रमुख समस्यांचे आव्हान असणार आहे. निवडणूक धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या नावावर लढविली जाते, असे आझाद म्हणाले. डोडामध्ये प्रचार सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. या राजकारण्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये आग लावल्यानंतर सर्व नेते घाटी सोडून बाहेर स्थायिक झाले आहेत, अशी टीका आझाद यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वच राजकीय पक्षांवर केली. 

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये 19 एप्रिलला, जम्मूमध्ये 26 एप्रिलला, अनंतनाग-राजौरीमध्ये 7 मे रोजी, श्रीनगरमध्ये 13 मे रोजी आणि बारामुल्लामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४