शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘रेप इन इंडिया’वरून संसदेत गदारोळ; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 02:32 IST

मोदींमुळे ईशान्य भारत संकटात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडियाची भाषा करीत असले तरी भारतात सध्या सर्वत्र बलात्कार होत आहेत ते पाहता एखाद्याला हा देश रेप इन इंडिया वाटू शकतो या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपच्या खासदारांनी लोकसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ घातला तर राज्यसभेत महिला खासदारांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी भाजपने मागणी केली. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लोकसभेत लावून धरली असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आम्हाला न्याय हवा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते. राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. तरीही सत्ताधारी व विरोधी बाकांवरून सुरू असलेला गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकुब केले.

गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तासही होऊ शकला नाही. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी वादग्रस्त उद्गार काढून महिला व भारतीय जनतेचा अपमान केला आहे. लोकांनी बलात्कार करण्यास प्रवृत्त व्हावे असे उद्गार त्यांनी काढले आहेत. सर्व पुरुष बलात्कारी नसतात. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही काही भाजप सदस्यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली.

राज्यसभेतही गोंधळ

ईशान्य भारतातील तणावग्रस्त स्थितीवर राज्यसभेत शून्य प्रहरात काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी विचार मांडले. त्यावेळी प्रख्यात नृत्यांगना व खासदार सोनल मानसिंग यांनी राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली. राहुल यांचे उद्गार देशातील महिलांचा अपमान करणारे आहेत असा आक्षेप सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदारांनी घेतला. त्यांनी गदारोळ माजविला. मात्र राहुल गांधी हे राज्यसभेचे सदस्य नसून त्यामुळे त्यांचा नामनिर्देश करता येणार नाही असे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

मोदी यांनीच माफी मागावी : राहुल गांधी

रेप इन इंडिया वक्तव्याबद्दल मी कधीही माफी मागणार नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यूपीए सरकारच्या कारकीर्दीत दिल्ली ही बलात्काराची राजधानी बनली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले होते. त्याचा जुना व्हिडिओ मोदी यांनी पुन्हा पाहावा असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईशान्य भारताला आगीच्या खाईत लोटले आहे. हाच सध्याचा ज्वलंत प्रश्न असून त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जात आहे. ईशान्य भारताला संकटात टाकल्याबद्दल, भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त केल्याबद्दल मोदी यांनी माफी मागितली पाहिजे.

जनतेच्या भावना दुखावल्या : राजनाथसिंह

राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया वक्तव्यामुळे केवळ लोकसभेच्याच नव्हे तर देशातील साºया जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा सदस्यांना लोकसभेत राहाण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केली.राहुल गांधी यांनी देशाच्या सद्य:स्थितीवर साधेसरळ वक्तव्य केले असून त्यांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभा