शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 13:38 IST

Congress on Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहेत.

Bihar Political Crisis: देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची सुरुवात करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला दिला आहे. तसेच, आज सायंकाळी ते भाजपच्या नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यांच्यावर घणाघाती टीका केली. 

काय म्हणाले जयराम रमेश?"वारंवार राजकीय भागीदार बदलणारे नितीश कुमार बदलत्या रंग बदलण्यात सरड्यांनाही कडवी स्पर्धा देत आहेत. हा विश्वासघात करणाऱ्या तज्ज्ञांना आणि त्यांच्या तालावर नाचणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही. भारत जोडो न्याय यात्रेला पंतप्रधान आणि भाजप घाबरले असून यावरून लक्ष वळवण्यासाठी हे राजकीय नाट्य रचल्याचे स्पष्ट झाले आहे," अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

इंडिया आघाडी मजबूत दरम्यान, पश्चिम बंगालमधील बागडोग्रा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या भविष्याबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, ''भारताची आघाडी मजबूत आहे. काही स्पीडब्रेकर आले आहेत, मात्र आम्ही एकत्र येऊन भाजपविरोधात लढू. सर्व पक्ष - DMK, NCP, TMC आणि SP एकत्र निवडणुका लढवतील आणि भाजपचा पराभव करतील,'' असं ते यावेळी म्हणाले.

राजीनाम्याची अनेक दिवसांपासून चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार इंडिया आघाडी सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर नितीश कुमार राजीनामा देणार असल्याचे रविवारी ठरले. त्यांनी रविवारी सकाळी राजभवन गाठून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका होणार असताना नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहारमधील महाआघाडी तसेच इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा