शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 13:38 IST

Congress on Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहेत.

Bihar Political Crisis: देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची सुरुवात करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला दिला आहे. तसेच, आज सायंकाळी ते भाजपच्या नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यांच्यावर घणाघाती टीका केली. 

काय म्हणाले जयराम रमेश?"वारंवार राजकीय भागीदार बदलणारे नितीश कुमार बदलत्या रंग बदलण्यात सरड्यांनाही कडवी स्पर्धा देत आहेत. हा विश्वासघात करणाऱ्या तज्ज्ञांना आणि त्यांच्या तालावर नाचणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही. भारत जोडो न्याय यात्रेला पंतप्रधान आणि भाजप घाबरले असून यावरून लक्ष वळवण्यासाठी हे राजकीय नाट्य रचल्याचे स्पष्ट झाले आहे," अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

इंडिया आघाडी मजबूत दरम्यान, पश्चिम बंगालमधील बागडोग्रा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या भविष्याबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, ''भारताची आघाडी मजबूत आहे. काही स्पीडब्रेकर आले आहेत, मात्र आम्ही एकत्र येऊन भाजपविरोधात लढू. सर्व पक्ष - DMK, NCP, TMC आणि SP एकत्र निवडणुका लढवतील आणि भाजपचा पराभव करतील,'' असं ते यावेळी म्हणाले.

राजीनाम्याची अनेक दिवसांपासून चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार इंडिया आघाडी सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर नितीश कुमार राजीनामा देणार असल्याचे रविवारी ठरले. त्यांनी रविवारी सकाळी राजभवन गाठून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका होणार असताना नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहारमधील महाआघाडी तसेच इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा