शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

130 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स?; काँग्रेसने मोदी सरकारकडे केल्या 10 मागण्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 09:40 IST

देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांनाच अभिमान आहे. करोनाशी दोन हात करताना हे सगळेच अत्यावश्यक सेवा देत आहेत.

नवी दिल्ली: चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.  सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. 

कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर देशभरतून जनता कर्फ्यूला उत्सफूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला. तसेच ताळ्या, थाळ्या व घंटानाद करुन देशभरात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या लोकांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काँग्रेसने 10 मोदी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत मोदी सरकारकडे मागणी केली आहे.

1. देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांनाच अभिमान आहे. करोनाशी दोन हात करताना हे सगळेच अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांना आर्थिक मदत सरकारने दिली पाहिजे. याबाबत सरकारने तातडीने घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

2. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने रुग्णालयातील व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवावी. देशाची लोकसंख्या 130 कोटी असताना फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स आपल्याकडे आहेत.

3. आरोग्य विभागात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी N95 मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शील्ड, गॉगल्स, हँड कव्हर्स, रबराचे बूट, डिस्पोजेबल गाऊन उपलब्ध करुन द्यावेत जेणेकरुन काम करत असताना कोरोनापासून त्यांचा बचाव होण्यास मदत होईल.

4. देशभरात सॅनिटायझर्स, मास्क आणि लिक्विड यांचा काळा बाजार वाढला आहे. हा काळा बाजार करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे.

5. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्सची व्यवस्था करण्यात यावी.

6. आतापर्यत फक्त 16 हजार कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढवण्याची खूप गरज आहे.

7. लघू आणि मध्यम व्यावसायिकांच कोरोनामुळे मोठं नुकसान झालं आहे . त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं.

8. कोरोनामुळे बळीराजावर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच त्रस्त असलेला शेतकरी आणखी त्रस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी.

9. कोरोनामुळे मध्यमवर्गीय लोक, पगारी काम करणाऱ्यांमधील जे लोक EMI भरत आहेत तो स्थगित करावा. जेणेकरुन या वर्गालाही काही प्रमाणात मदत होईल.

10. मजुरी करणारे, असंघटीत काम करणारे कामगारांना देखील केंद्र सरकारने मदतीची घोषणा करवी, अशी मागणी  रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतSonia Gandhiसोनिया गांधी