शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कॉँग्रेसवाल्यांचा राफेलबद्दलही खोटारडेपणाच, नरेंद्र मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:33 IST

कॉँग्रेसवाल्यांना माहिती आहे की, नरेंंद्र मोदीला हरवायचे असेल, तर काहीही करून खाली पाडले पाहिजे. त्यामुळे ते दररोज माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत.

प्रतापगढ - कॉँग्रेसवाल्यांना माहिती आहे की, नरेंंद्र मोदीला हरवायचे असेल, तर काहीही करून खाली पाडले पाहिजे. त्यामुळे ते दररोज माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. राफेलबद्दलही त्यांनी खोटारडेपणा केला. ते रोज चिखलफेक करीत आहेत. माझी प्रतिमा मलिन करणे हे कॉँग्रेसचे एकमेव काम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ मध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना शायरी ऐकवली. ‘ना मैं गिरा ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे’ असा शेर नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान ऐकवला.नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा या लोकांना माझे काही वाईट करता आले नाही, तर ते आता माझी प्रतिमा खराब करत आहेत. जो पक्ष निवडणुकीपूर्वी स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार समजत होता, तो आता स्वत:ला मते कापलेला पक्ष मानू लागला आहे. कॉँग्रेसच्या पतनाचे हे जिवंत उदाहरण आहे.अन्य पक्षांमधील घराणेशाहीवर टीका करताना मोदी म्हणाले की, लक्षात घ्या नरेंद्र मोदी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला नाही, कोणत्याही राजघराण्यातही पैदा झालेला नाही. देशाच्या धुळीमधून तो जन्माला आला आहे. गेली ५० वर्षे न थकता, ना थांबता तो जगत आलेला आहे. या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यासाठी त्याने तपश्चर्या केली आहे. ५ किंवा ५० मुलाखतीदेऊन नरेंद्र मोदीची गेल्या ५०वर्षांची प्रतिमा तुम्ही बिघडवू शकतनाही.राजीव गांधी यांच्यावर टीकाराफेलवरून आपली प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नांचा आरोप कॉँग्रेसवर करून मोदी यांनी राहुल गांधी यांचेपिता दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केली. ‘मिस्टर क्लीन’ असा त्यांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची जीवनयात्रा ‘भ्रष्टाचारी नम्बर वन’च्या रूपातच संपली.या सभेत केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यांचा उल्लेख तिरकसपणे नामदार असा केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वी मोदीच्या तेजोवलयाला आपण घाबरत असल्याचे ते सांगत असत. आता मोदी करीत असलेले कष्ट, त्यांचा प्रामाणिकपणा आणि देशभक्तीवर जोपर्यंत डागलागत नाही, तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही, असे ते म्हणू लागले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpratapgarh-pcप्रतापगढ