शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

भारत-चीन मुद्द्यावर राजकारण तापलं; राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले 'हे' 3 प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 20:40 IST

LAC वरील डिसएंगेजमेन्टवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले. यानंतर, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा डिसएंगेजमेन्टवरून केंद्र सरकारला तीन प्रश्न करत उत्तर मागितले आहे. (India-China issue )

नवी दिल्ली - प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पेंगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण भागांतून भारत आणि चिनने आपले सैन्य मागे घेतल्यानंतर राजकारण तापले आहे. या डिसएंगेजमेन्टवरून (disengagement) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनीही राहुल गांधींवर पलटवार करत निशाना साधला. यातच, आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा डिसएंगेजमेन्टवरून केंद्र सरकारला तीन प्रश्न करत उत्तर मागितले आहे. (Rahul Gandhi asks 3 questions from Modi government on lac disengagement)

राहुल गांधींचे 3 प्रश्न - 1 - आपल्या जवानांना कैलास रेन्जमधील स्ट्राँग पॉझिशनवरून माघारी का बोलावले जात आहे?2 - आपण आपला भू-भाग का देत आहोत आणि जवानांना फिंगर 4 वरून फिंगर 3 वर का आणत आहोत?3 - चीनने देपसांग प्लेन्स आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सवरून सैनिकांना मागे का बोलावले नाही?

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर सरकारचा पलटवार; केंद्रीय मंत्री म्हणाले 'कुंदबुद्धी' पप्पू

जेपी नड्डांचा राहुल गांधींवर निशाणा -एलएसीवरील डिसएंगेजमेन्ट संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी जबरदस्त पलटवार केला. नड्डा म्हणाले, या डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेत सरकारकडून भारतीय जमीन देण्यात आलेली नाही. एवढेच नाही, तर त्यांनी एक व्हिडिओ डॉक्यूमेंट्री ट्विट करत, “जर कुणी हजारो वर्ग किलेमिटर जमीन सोडण्याचे पाप केले असेल तर, तो एका भ्रष्ट, भ्याड वंश आहे, ज्याने देशातील आपली शक्ती कायम ठेवण्यासाठी तोडला,” असे म्हटले आहे.

भारताची जमीन कोणी चीनला दिली, हे राहुल गांधींनी आजोबांना विचारावं; भाजपचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट, चीनचा सामना करू शकले नाही -तत्पूर्वी, भारत आणि चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला. 

...राहुल गांधी यांनी आपल्या आजोबांना विचारावे -भारताची जमीन चीनला कोणी दिली? हे राहुल गांधी यांनी आपले आजोबा, म्हणजेच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना विचारावे. राहुल गांधींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हेही राहुल गांधीना समजेल. जनतेला सर्व काही माहिती आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

रणदीप सिंह सुरजेवाला होणार भाजपत सामील? या मोठ्या नेत्यानं दिली ऑफरकुंदबुद्धी पप्पू -याच मुद्द्यावर, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, "कुंदबुद्धी पप्पू जींच्या कमालीचा कुठलाही रस्ता नाही. दुसरीकडून सुपारी घेऊन देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आणि संरक्षण दलाचे मनोबल तोडण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. त्यावर काही उपचार नाही."

टॅग्स :ladakhलडाखRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन