शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले, राहुल गांधींकडून मोदी सरकारचे कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 21:16 IST

आज केंद्रातील मोदी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. यावर, सरकारचा हा निर्णय योग्य असून सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देजनतेच्या मदतीसाठी मोदी सरकारने जाहीर केले 1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज राहुल गांधी म्हणाले, सरकारने योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल पंतप्रधानांच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत करण्यात आली पॅकेजची घोषणा 

नवी दिल्ली - देशात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन केला आहे. यामुळे लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आज केंद्रातील मोदी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. यावर, सरकारचा हा निर्णय योग्य असून सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद पारपडल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी सरकारचे कौतुक केले आहे. ‘आज सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज म्हणजे, सरकारने योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीचे भारतावर ऋण आहे,’ असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरिबांना, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यात टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा यामागील उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल 1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल 10 कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या  व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतdelhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेस