शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी

By देवेश फडके | Updated: February 20, 2021 12:35 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल डिझेल दरवाढीवरून विरोधकांची टीकाप्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणाराहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांचेही टीका करणारे ट्विट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (congress leader priyanka gandhi criticized modi government over fuel price hike)

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी एक ट्विट करत मोदी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी वाढलेल्या इंधनदरवाढीचा एक फोटो शेअर केला आहे. ''संपूर्ण आठवड्यात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, तो दिवस भाजप सरकारने 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा'', असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेसाठी हे 'महंगे दिन' ठरत आहेत, अशी खोचक टीकाही प्रियंका गांधी यांनी यावेळी केली आहे. 

महागाईचा विकास

दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. 'महागाईचा विकास', या दोनच शब्दांच्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याशिवाय या ट्विटसोबत वेगवेगळ्या हेडलाइन्स असलेला एक फोटोही शेअर केला आहे. 

महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते; बिहारमधील मंत्र्याचे अजब तर्कट

केंद्राच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. सलग अकरा दिवस किमती वाढल्या आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमती UPA सरकारच्या कार्यकाळापेक्षा अर्ध्यावर आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर गेले आहेत, असे अशोक गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

दरम्यान, गेले सलग अकरा दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. या दरवाढीने दिल्लीत पेट्रोलने ९० रुपयांची तर डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत साधे पेट्रोल ९७ रुपयांच्या नजीक गेले आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दरवाढीचा धडका कायम आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPetrolपेट्रोलDieselडिझेलBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधी