शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी

By देवेश फडके | Updated: February 20, 2021 12:35 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल डिझेल दरवाढीवरून विरोधकांची टीकाप्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणाराहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांचेही टीका करणारे ट्विट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (congress leader priyanka gandhi criticized modi government over fuel price hike)

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी एक ट्विट करत मोदी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी वाढलेल्या इंधनदरवाढीचा एक फोटो शेअर केला आहे. ''संपूर्ण आठवड्यात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, तो दिवस भाजप सरकारने 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा'', असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेसाठी हे 'महंगे दिन' ठरत आहेत, अशी खोचक टीकाही प्रियंका गांधी यांनी यावेळी केली आहे. 

महागाईचा विकास

दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. 'महागाईचा विकास', या दोनच शब्दांच्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याशिवाय या ट्विटसोबत वेगवेगळ्या हेडलाइन्स असलेला एक फोटोही शेअर केला आहे. 

महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते; बिहारमधील मंत्र्याचे अजब तर्कट

केंद्राच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. सलग अकरा दिवस किमती वाढल्या आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमती UPA सरकारच्या कार्यकाळापेक्षा अर्ध्यावर आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर गेले आहेत, असे अशोक गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

दरम्यान, गेले सलग अकरा दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. या दरवाढीने दिल्लीत पेट्रोलने ९० रुपयांची तर डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत साधे पेट्रोल ९७ रुपयांच्या नजीक गेले आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दरवाढीचा धडका कायम आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPetrolपेट्रोलDieselडिझेलBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधी