शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी

By देवेश फडके | Updated: February 20, 2021 12:35 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल डिझेल दरवाढीवरून विरोधकांची टीकाप्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणाराहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांचेही टीका करणारे ट्विट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (congress leader priyanka gandhi criticized modi government over fuel price hike)

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी एक ट्विट करत मोदी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी वाढलेल्या इंधनदरवाढीचा एक फोटो शेअर केला आहे. ''संपूर्ण आठवड्यात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, तो दिवस भाजप सरकारने 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा'', असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेसाठी हे 'महंगे दिन' ठरत आहेत, अशी खोचक टीकाही प्रियंका गांधी यांनी यावेळी केली आहे. 

महागाईचा विकास

दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. 'महागाईचा विकास', या दोनच शब्दांच्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याशिवाय या ट्विटसोबत वेगवेगळ्या हेडलाइन्स असलेला एक फोटोही शेअर केला आहे. 

महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते; बिहारमधील मंत्र्याचे अजब तर्कट

केंद्राच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. सलग अकरा दिवस किमती वाढल्या आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमती UPA सरकारच्या कार्यकाळापेक्षा अर्ध्यावर आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर गेले आहेत, असे अशोक गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

दरम्यान, गेले सलग अकरा दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. या दरवाढीने दिल्लीत पेट्रोलने ९० रुपयांची तर डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत साधे पेट्रोल ९७ रुपयांच्या नजीक गेले आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दरवाढीचा धडका कायम आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPetrolपेट्रोलDieselडिझेलBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधी