शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

काँग्रेसचा आता न्यायालयावरही विश्वास राहिला नाही : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 15:39 IST

मोदी येथे रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

रायबरेली : राफेल खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यावर एकीकडे काँग्रेस प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायबरेलीतच काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयावरही आता काँग्रेसचा विश्वास राहिलेला नसल्याचा आरोप  मोदी यांनी केला. मोदी येथे रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

देशासमोर दोन शक्ती आहेत. एक देश कसा संरक्षण क्षेत्रात ताकदवान होईल आणि दुसरी ताकद देश कसा खच्चीकरण होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. देश पाहतोय की काँग्रेस देशाला कमजोर करणाऱ्या शक्तीबरोबर उभा आहे जी शक्ती संरक्षण दलांना ताकदवान झालेले पाहत नाही, असे सांगताना मोदी यांनी रामचरित्रमानस या ग्रंथाचा आधार घेत काही लोक खोट्याचाच स्वीकार करतात, खोटेच सांगत फिरतात, खोटेच खातात आणि चावतात, असा टोलाही लगावला. 

या लोकांसाठी संरक्षण मंत्रालयही खोटे वाटतेय, देशाचे संरक्षण मंत्रीही खोटे वाटतात, हवाईदलाचे अधिकारीही खोटेच वाटतात आणि आता तर सर्वोच्च न्यायालयही खोटे वाटू लागले आहे. खोटे कितीही बोलले गेले तरीही त्यामध्ये आत्मा असत नाही. खोटेपणावर नेहमी सत्याचाच विजय होतो, असेही मोदी यांनी सांगितले. 

कारगिल युद्धानंतर आपल्या हवाईदलाला अत्याधुनिक विमानांची गजर भासू लागली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनंतर काँग्रेसने 10 वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, हवाईदलाची ताकद वाढविली नाही. कशासाठी, कोणाच्या दबावाखाली, असा प्रश्नही मोदी यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, काँग्रेसनेही मोदी यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना सांगितले की, जो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलू शकतो, त्याच्याकडून सत्याची अपेक्षा कशी करता येईल. सरकारने खोटे सांगतिल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय त्वरित मागे घ्यायला हवा. तसेच सरकारला न्यायालयाचा अवमान केल्य़ाप्रकरणी नोटीस पाठवायला हवी, असे काँग्रेसचे प्रवक्ता शर्मा यांनी सांगितले. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस