शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

काँग्रेसच्या तीन राज्यांतील पराभवाने समीकरण बिघडले, आता JDUने INDIA आघाडीबाबत केली अशी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 3:19 PM

Assembly Election Result 2023: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याबरोबरच या पराभवामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षांच्या आघाडीतील समिकरण बिघडले आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याबरोबरच या पराभवामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षांच्या आघाडीतील समिकरण बिघडले आहे. तसेच आता या आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. जेडीयूचे राज्य सरचिटणीस निखिल मंडल यांनी एक्सवर पोस्ट करत काँग्रेसला टोला लगावताना लिहिले की, आता इंडिया आघाडीनेनितीश कुमार यांच्या मतानुसार वाटचाल केली पाहिजे.

काँग्रेसला टोला लगावताना निखिल मंडल म्हणाले की, मागच्या काही काळात काँग्रेस पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत गुंतलेली होती. त्यामुळे त्यांना  इंडिया आघाडीवर लक्ष देता येत नव्हते. आता काँग्रेसने निवडणूक लढवली आहे. तसेच निकालही समोर आहेत. नितीश कुमार हेच इंडिया आघाडीचे सूत्रधार आहेत आणि तेच या आघाडीची नौका पार करू शकतात. 

दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील मतमोजणीमध्ये भाजपाने आघाडी घेताना स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्यामुळे भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निकाल जाहीर होत असतानाच ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमार