शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

तीन अंकी जागा जिंकण्याचा काँग्रेसला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 3:20 AM

महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांत चांगल्या कामगिरीची आशा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत तीन अंकी जागा जिंकण्याचा आत्मविश्वास काँग्रेसला वाटत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली राहील, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.काँग्रेसने १९९९च्या लोकसभा निवडणुकांत केवळ ११९ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त ४४ जागांवर विजय मिळाला. त्या वेळी गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली, ओडिशा या राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. एवढेच नव्हेतर, कोणत्याही राज्यात काँग्रेसला दोन अंकी जागा मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला यंदा आपल्या जागा तीन अंकात म्हणजे १00 वा त्याहून अधिक असतील, अशी खात्री वाटत आहे.

राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. लोकसभेतील एकूण जागांच्या दहा टक्केही जागा जिंकता न आल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, दिल्ली, ईशान्य भारतातील राज्ये येथे मोठे यश मिळणार नाही याची खूणगाठ काँग्रेसने मनाशी बांधली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह वरील सात राज्यांवर काँग्रेसची भिस्त दिसत आहे. 

लोकसभा निवडणुकांचा अंतिम म्हणजे सातवा टप्पा १९ मे रोजी पार पडल्यानंतर मतदारसंघनिहाय आढावा घेऊन आपल्याला किती जागा मिळू शकतील, याचा काँग्रेस पुन्हा अंदाज घेणार आहे. मोदी सरकार जनतेला नकोसे झाले असून ते बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकांत जनतेने मतदान केल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसने पक्षातर्फे देशभर जे सर्वेक्षण केले आहे, त्यातून हा निष्कर्ष निघाला असल्याचे समजते. अलीकडेच ज्या राज्यांत विधानसभा निवडणुकांत झाल्या, तेथील जागांमध्ये २0१४ च्या तुलनेत मोठी वाढ होईल, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिंघवी म्हणतात, सर्वाधिक जागा जिंकूलोकसभा निवडणुकांनंतर सर्वांत जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येईल, असा दावा त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. पुरेशा बहुमताच्या बळावर बिगरभाजप सरकार केंद्रात स्थापन करणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र