शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक, अमित शहांकडून टीम इंडियाचे हटके अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 10:29 IST

अमित शहा यांनी ट्विटरवरुन भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना

मुंबई - विश्वचषक स्पर्धेतील सर्वात हीट समजला जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला मात देत एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर, भारतात सर्वत्र विजयाचे सेलिब्रेशन सुरु झाले. बॉलिवूड, राजकारणी आणि सर्वसामान्य जनतेनंही या विजयाचा आनंद व्यक्त केला. पाकिस्तानला कशाप्रकारे धूळ चारली, याबाबात भारतीय सोशल मीडियावरुन शब्दांचे फटाके फुटत होते. त्यातच, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.   

अमित शहा यांनी ट्विटरवरुन भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना, भारताचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि निकाल पुन्हा तोच... असे ट्विट केले आहे. आपल्या स्टाईलनेच अमित शहा यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या हद्दीतील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. त्यातच, नुकतेच मोदींची हजेरी लावलेल्या परिषदेतही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जाणीवपूर्वक टाळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, या सामन्याकडे एका युद्धाप्रमाणे पाहिले जात होते. मात्र, भारताने सहजच पाकिस्तानला लोळवले, आणि विश्वचषक स्पर्धेत सलग सातव्यांदा विजय मिळविण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्यानंतर, सोशल मीडियावरुन पुन्हा एका पाकिस्तानवर शाब्दीक स्ट्राईक सुरू झाले. तर, भारताचा पाकिस्तानवर सेव्हन स्ट्राईक असेही म्हटले गेले. त्यातच, अमित शहांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.  

जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात भारतीय संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पराभव केला. भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव 40 षटकात 6 बाद 212 धावांत रोखला गेला. पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या 5 षटकात 136 धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. मात्र, त्यांना केवळ 46 धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघICC World Cup 2019वर्ल्ड कप 2019India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान